Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुवाहाटी बंडावेळी गुरुदेव श्री. श्री. रवीशंकर यांचा होता एकनाथ शिंदेंना फोनवरून आशीर्वाद

Date:

जालना-गुवाहाटी बंडावेळी गुरुदेव श्री. श्री. रवीशंकर यांनी आपल्याला आशीर्वाद दिला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते गुरुवारी जालना येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रवीशंकर गुरुजी यांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी श्री. श्री. रवीशंकर गुरुजींच्या यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचेही ते म्हणाले.

तो ‘कार्यक्रम’ झाल्यामुळे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो. तेव्हा गुरुदेवांनी मला फोनवर आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना एक लढाई आम्ही सुरू केलेली आहे, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बिलकुल चांगले आहे. चांगले काम करत राहा. अच्छा, सफल व्हा. गुरुदेवजी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. त्यावेळी तो ‘कार्यक्रम’ झाल्यामुळे आता हे ‘कार्यक्रम’ सुरू आहेत. गुरुदेव आमचे सरकार जे आम्हाला चांगला सल्ला देतील, त्याचा सन्मान करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जलसंधारणाचे मोठे काम

एकनाथ शिंदे म्हणाले की, श्री. श्री. रवीशंकर यांचे अध्यात्म, व्यसनमुक्ती, तणावमुक्ती, नैसर्गिक शेती, जलसंधारणातही त्यांचे फार मोठे काम आहे. आपल्याला जलतारा, जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनांना पुढे न्यायचे आहे.

उद्योगांनी दाखवला विश्वास

आम्ही दाओसमध्ये गेलो तेव्हा एक लाख 37 हजारांचे एमएओ केले. हे दाखवण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात आणण्यासाठी. या राज्यासाठी त्याचा खूप फायदा होईल. राज्यात आणि केंद्रात विकासाचा विचार करणारे समविचारी सरकार आहे. त्यामुळे अनेक उद्योग आमच्यावर विश्वास दाखवत आहेत. लोकांना विश्वास पाहिजे. तो विश्वास मोदी साहेबांनी या जगाला दिला असल्याचे शिंदे म्हणाले.

एक लाख गावांत जलतारा

गुरुदेवांनी दाओसमध्ये येऊनही आम्हाला आशीर्वाद दिला. गेल्या सहा महिन्यांत आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यातला एकही निर्णय वैयक्तिक लाभ देणारा नाही. गणपती, नवरात्रोत्सव, दीपावली सगळे सण आम्ही पुन्हा सुरू केले. शेवटी माणसाने मनमोकळेपणाने आपले सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. ही आपली परंपरा आहे. एक लाख गावांमध्ये जलतारा प्रकल्प राबवण्याचा श्री श्री रवीशंकर यांचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दैवाश्रय आणि राजाश्रय

श्री. श्री. रवीशंकर म्हणाले की, पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारचे काम केले. तेव्हा ते म्हणाले होते की, आमचे ७० टक्के काम हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून झाले आहे. स्वयंसेवक जेव्हा कोणते काम हाती घेतात. तेव्हा ते सफल होतेच. कारण दैवाश्रय आणि राजाश्रय सोबत घेऊन चालतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...