रेराच्या कारणाने बांधकामांची दस्त नोंदणी थांबविल्याने दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो कुटुंबांना वाऱ्यावर सोडू नका -खर्डेकर यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती

Date:

पुणे -महापालिकेत समाविष्ट झालेली ११ गावे आणि एकूणच महापालिका लगतची सर्व ग्रामीण भागातील शेकडो,हजारो बांधकामांची रेरा नोंदणी नसल्याच्या कारणाने दस्त नोंदणी थांबविल्याने सुरु झालेल्या दुष्टचक्रात अडकून पडली आहेत .ज्याचा भयाण फटका केवळ बांधकाम व्यावसायिकच नव्हे तर अनेक कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था ,बैंका आणि विशेष म्हणजे हि बांधकामे बुकिंग केलेली अगर त्यासाठी कर्ज घेतलेली लाखो कुटुंबातील व्यक्तींना थेट बसला आहे याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष क्रियेटीव्ह फौन्डेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी वेधले आहे.

या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कडे एक विशिष्ट डेडलाईन ठरवून त्यापूर्वीच्या बांधकामाना रेरा ची अट शिथिल करून त्यांची दस्त नोंदणी सुरु करावी अशी मागणी केली आहे .या विषयी खर्डेकर यांनी सांगितले कि,पुणे महापालिकेच्या हद्दीत वाढ करुन उर्वरित २३ गावे पुणे मनपा त समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही राज्य सरकारने सुरु केली असल्याचे वाचनात आले.खरेतर ही गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करणे संयुक्तिक ठरणार आहे,कारण एकतर कोरोनाच्या संकटामुळे पुणे शहरातील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत,अर्थचक्र थांबल्यामुळे राज्य सरकार देखील विकासासाठी निधी देण्यात असमर्थ असल्याचे दिसून येते.अगोदर घेतलेल्या ११ गावांना ही याचा फटका बसला आहेच.मात्र आत्ताचे निवेदन समावेश करावा किंवा नाही याच्याशी संबंधित नाही.पण आज आपण लक्ष वेधू इच्छितो ते ह्या गावां मधील अनधिकृत बांधकामां कडे.हजारो इमारती आज बांधून तयार आहेत.मात्र या इमारतीं मधील सदनिकेच्या दस्त नोंदणीचा विषय अतिशय गंभीर असून अनेक मंडळी रेरा च्या निर्णयाने उद्ध्वस्त होत आहेत.वस्तुतः दस्त नोंदणी थांबवणे कोणत्याही कायद्यात बसत नाही असे तज्ञांचे मत आहे..
तसे निकाल ही उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.
एकवेळ यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचा विचार करु नका पण ज्या हजारो नागरिकांनी फ्लॅट बुक केले,कर्ज काढले,हप्ते ही सुरु झाले त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे / या सामान्य नागरिकांना कोणीच वाली नाही आणि दस्त नोंदणी होत नसल्याने त्यांना कर्जाचे अंतिम disbursement ही होत नाही. रेराच्या नोव्हेंबरच्या पत्रामुळे ही वेळ आली आहे.
जर प्रामाणिकपणे अनधिकृत बांधकाम थांबवायचे असेल तर एक डेडलाईन ठरवून द्यावी की समजा ३१ डिसेंबर २०२० नंतर रेराच्या परवानगी शिवाय होणाऱ्या बांधकामांची नोंदणी होणार नाही.पण आज ज्या शेकडो इमारती ग्रामीण भागात उभ्या आहेत त्यांचे भविष्यच अधांतरी आहे.
ही बांधकामे होत असताना सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होते हे उघडच आहे.
तरी गावे पुण्यात घेत असताना या विषयाचा गांभीर्याने विचार करावा व सदनिका खरेदीदारांना दिलासा द्यावा.ह्या बांधकामां वर हातोडा चालविण्याची कारवाई करणे राष्ट्रीय संपत्ती चे नुकसान करण्यासारखे आहे.यापूर्वी अनेक बांधकामे कधी गुंठेवारीत तर कधी दंड आकारुन नियमित केली आहेत.त्याच धर्तीवर गावांच्या समावेशापूर्वी ह्या बांधकामांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
बैठया घरांची ही खरेदी विक्री ची दस्तनोंदणी होत नाहीये हे ही त्रासदायक ठरत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हवेली आणि मुळशी तालुक्यातील दस्त नोंदणी थांबवली आहे,उर्वरीत सर्वत्र फ्लॅट चे व तुकडा जमीनीचे दस्त केले जात आहेत. रहिवासी,औद्योगिक व शेती झोन मधील जमीन मिळकतींचे व नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींच्या फ्लॅट मिळकतीचे खरेदी दस्तांची नोंदणी करण्यावर फक्त हवेली व मुळशीत घालण्यात आलेले निर्बंध अन्यायकारक आहेत.असे आपले स्पष्ट मत आहे.तरी या विषयात उपमुख्यमंत्र्यांनी मार्ग आढावा अशी विनंती संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...