औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस समोरा-समोर आलेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला
काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल, अशी टीका शिवसेनेने सामनातून केली होती. त्याला उत्तर देताना सोशल मीडियावरील पोस्टद्वारे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहोत . काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही. आपली मते वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल,’ असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.