Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा … कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर

Date:

पुणे– महाराष्ट्र राज्य फलोत्पादनात देशात अग्रेसर असून महाराष्ट्रातून द्राक्षाची विक्रमी

निर्यात होते. जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या जातीच्या द्राक्षाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे

त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 56 व्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन येथील बालेवाडी

क्रिडा संकुलात करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते दिप

प्रज्वलनाने झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार

शरद पवार होते. यावेळी व्यासपिठावर खासदार अनिल शिरोळे, कृषि आयुक्त विकास देशमुख, महाराष्ट्र

राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, महाग्रेप्सचे अध्यक्ष सोपान

कांचन, उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, द्राक्ष निर्यातीमधून देशाला सुमारे 16

हजार कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त होते. या निर्यातीमध्ये महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या द्राक्ष

उत्पादनाचा मोठा वाटा आहे. द्राक्षाच्या निर्यातीसाठी आवश्यक सर्व सोपस्कार करता यावे, यासाठी

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रेपनेट प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत

मागणी असलेल्या वाणांचा वापर करुन द्राक्ष उत्पादनात वाढ करावी, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत

शासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

अध्यक्षीय भाषणात खासदार शरद पवार यांनी परदेशात द्राक्ष उत्पादनामध्ये होणाऱ्या बदलाची

दखल घेऊन ते तंत्रज्ञान येथील द्राक्ष उत्पादकांनी आत्मसात करावे, त्याचे प्रभावी विपणन करण्याकडे

प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

जागतिक स्तरावर यशस्वी होणारे तंत्रज्ञान येथे उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे

असे सांगून शरद पवार म्हणाले की, कमीत कमी पाण्यामध्ये उत्पादित होणाऱ्या पिकांचे उत्पादन

घेण्यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करावे, यासाठी शासनाने त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन

केले. शेतकऱ्यांनी पाणी वाचवणाऱ्या तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने ठिबक

सिंचन पध्दतीबाबत सर्वसमावेश धोरण राबवावे. फळपिक उत्पादकांना करण्यात येणाऱ्या कर्ज वितरण

प्रणालीची नव्याने आखणी करणे आवश्यक आहे. जगामध्ये ज्या नवनवीन वाणांचा वापर करुन

फळपिकांचे उत्पादन घेण्यात येते, त्याचे उत्पादन येथील शेतकऱ्यांनी घ्यावे जेणेकरुन निर्यातीमध्ये वाढ

होईल असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...