पुणे : चित्रप्रदर्शनातून चित्र पाहता येते, नकळत चित्रांशी बोलता येते, चित्ररुपी वाक्य बोलके वाटतात.
शासनाच्या विविध योजना चित्ररुपाने खूप छान पध्दतीने मांडल्या आहेत. याठिकाणी लावलेले छायाचित्र प्रदर्शन
खरोखरच स्तुत्य आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले आहेत. त्यासोबत
लाखो वारकरी पुण्यनगरीत आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन एका
रांगेत वारकरी मनोभावे घेत आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेत लावलेले चित्रप्रदर्शन सगळयांचे आकर्षण
ठरत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनायच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून 'संवादवारी' हा नावीन्यपूर्ण
उपक्रम सुरु केला आहे. लाखो भाविक या वारीत सहभागी होतात. संपूर्ण राज्यातून वारकरी पंढरपूरात विठ्ठलाच्या
दर्शनसाठी येतात.
माहिती व जनसंपर्क या विभागाला शासनाचे कान, नाक, डोळे म्हटले जाते, जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत
पोहचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. शासकीय संदेशाचे प्रसारण आणि कल्याणकारी योजनांबाबत
जनजागृती हे ब्रीद घेऊन ‘संवादवारी’ सहभागी झाली आहे.
‘संवादवारी’संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ज्ञानेश्वर महाराजांच्या रथापुढील दिंडी क्रमांक एकचे
प्रमुख श्री. राणोजी वासकर महाराज म्हणाले, विसाव्यासाठी दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबतो. या शाळेच्या
प्रवेशद्वारावर लावलेले चित्ररथही सर्वांना आकर्षून घेत आहे, खरोखरच हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमास माझ्या
शुभेच्छा.
चित्रप्रदर्शन आणि कलापथक शासनाचे स्तुत्य उपक्रम
Date:




