Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डाळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा साठवणूक मर्यादेत तीन पटीने वाढ, मंत्री बापट यांची माहिती

Date:

पुणे  दि. 3 : यंदा राज्यातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्याची बाजारात आवक वाढली आहे. याचा विचार करून राज्य शासनाने तुरीसह सर्व डाळींच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठीच्या साठवणूक मर्यादेत तीन पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डाळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात साठा मर्यादा घाऊकसाठी ३५०० क्विं. वरुन १०, ५०० तर किरकोळसाठी २०० वरून ६०० क्विंटल तसेच अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात घाऊकसाठी २, ५००  क्विं. वरून ७, ५००  तर किरकोळसाठी १५० वरुन ४५० क्विं. आणि इतर ठिकाणी घाऊकसाठी १,५००  वरुन ४, ५०० क्विं तर किरकोळसाठी १५०  वरून ४५०  क्विंटल इतकी वाढ करण्यात आली आहे. डाळींचा खरेदी हंगाम म्हणजे ३१  मार्चपर्यंत ही साठा मर्यादेची सुधारणा लागू राहणार आहे.

मंत्री बापट म्हणाले की , गेल्या वर्षीच्या हंगामात तूर उत्पादन कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवला होता. त्यावेळी राज्य शासनाने तूर उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणावर तूर डाळींचे उत्पादन झाले आहे. ही तूर सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. तसेच नाफेडमार्फतही ५, ५०० रुपये प्रति क्विंटल हमी भावावर तूर खरेदी करण्यात येत आहे. मात्र, त्याला मर्यादा आहेत. तसेच बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र, डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा असल्यामुळे व्यापारांकडून खरेदी कमी प्रमाणात होत होती. या गोष्टींचा विचार करून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने डाळींच्या साठवणूक मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बाजारात तुरीचे दर स्थिर होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या तूर डाळींची खरेदी वाढण्यास मदत होणार आहे, साठा मर्यादेत सुधारणा झाल्यासंबंधीची माहिती विभागाने सर्व जिल्हाधिकारी, पुरवठा विभागातील संबंधितांना कळवून यासंबंधीची तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचेही श्री. बापट यांनी सांगितले आहे.

ते  पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी राज्यात तूरडाळीच्या दरवाढीचा भडका उडाला. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागल्याने आपण राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक अल्प व दीर्घकालीन पावले उचलली. केवळ आपल्याच देशात तूरडाळीची मोठी मागणी असल्याने आम्ही अफ्रिकेतूनही डाळ मागवली व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून ती लोकांना कमी दरात उपलब्ध करून दिली. या सारख्या निर्णयाच्या माध्यमातून जनतेला रास्त किमतीत डाळ मिळण्यासाठी प्रयत्न करतानाच आमच्या अन्नदाता शेतकऱ्यालाही त्याच्या घामाचा योग्य मोबदला देण्यास आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे बापट यांनी आवर्जून नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...