पुणे: संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची आज नियुक्ती करण्यात आली. लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत.
अर्थमंत्री अंदाजपत्रक मांडत असतात, या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या अंदाजाची चिकित्सा करणे,शासनाच्या खर्चात काटकसर सुचवून शासकीय धोरणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना करणे या सारखी कामे या समितीला करावी लागतात. ही समिती शासकीय धोरणानुसार व योजनांनुसार व अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे निधीवाटप केला आहे की नाही याबबत पडताळणी करते. या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारण्याचे लोकसभेला बंधनकारक नसल्या तरी समितीच्या सूचना व शिफारशी या मार्गदर्शनपर असतात. समितीच्या स्थापने पासून अनेकदा या समितीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या पूर्वी मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने या समिती मध्ये काम केले आहे.
धर्मेंद्रकुमार कश्यप, मोहनभाई कुंडारिया, दयानिधि मारण, के. मुरलीधरन, एस. एस.पलानीमणीक्कम , कमलेश पासवान, के. सी. पटेल, राजवर्धन सिंग राठोड, विनायक राऊत, अशोककुमार रावत, मागुंटा श्रीनिवासुलू रेड्डी, राजीव प्रताप रुडी, फ्रांसिस्को सरडिन्हा, जुगल किशोर शर्मा, धरमवीर सिंग, संगीता कुमारी सिंग देव, केसीनेनी श्रीनिवास, सुनील तटकरे ,प्रवेश साहिब सिंह वर्मा हे या समितीच्या सदस्यपदी असणार आहेत.