वैफल्यग्रस्त मोदी यांना पराभव दिसू लागल्याने भावनिक गोष्टींचे भांडवल -आनंद शर्मा

Date:

पुणे- मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही.
उलट जे काही निर्णय घेतले त्यामुळे समाजातील सर्व वर्गातील घटक हैराण झाले. पंतप्रधान मोदी यांना
निवडणूक प्रचार सभेत सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही त्यामुळेच मोदी वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना
आपला पराभव दिसत असल्याने ते शहिद जवानांच्या नावावर तसेच जातीचे अकारण भावनिक भांडवल
करून जनतेकडे मते मागत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय
मंत्री आनंद शर्मा यांनी गुरुवारी येथे केली. पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व
मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या
पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी, आमदार शरद रणपिसे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, संजय
बालगुडे, गोपाळ तिवारी, राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आदी उपस्थित होते.
मोदी सरकार सर्व आघाड्यांवर कसे अयशस्वी झाले त्याचा आढावा घेताना आनंद शर्मा यांनी मोदी
यांनी सत्तेचा कसा दुरुपयोग केला याची तपशीलवार उदाहरणे दिली. मोदींच्या राजवटीत देशातील जनता
अतिशय त्रस्त झाली त्यामुळे या सरकारपासून मुक्ती मिळावी अशीच जनतेची भावना आहे आणि
देशातील सध्याचे वातावरण पाहता या निवडणुकीत मोदी आणि भाजपचा पराभव अटळ आहे असे त्यांनी
सांगितले.
मोदी सरकारने गरीब शेतकरी यांची कर्जमाफी केली तर नाहीच उलट उद्योगपतींची साडेतीन लाख
कोटींची कर्जे माफ केली असे सांगून शर्मा म्हणाले, काँग्रेसच्या राजवटी वाढत गेलेला देशाचा
विकासदर, मोदी सरकारच्या राजवटीत घसरतच गेला. मोदी सरकारने घाईघाईने घेतलेल्या नोटाबंदी,
जीएसटी सारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, नवीन रोजगार मिळण्याऐवजी तरुणांचे आहे ते
रोजगार गेले. त्यामुळे बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढली, पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज दरवाढीमुळे सामान्य जनता
आणखी हवालदिल झाली मात्र दुसरीकडे निधी म्हणून निवडणूक रोखे द्वारे मिळालेल्या प्रचंड पैशामुळे
भाजप हा पक्ष वरचेवर श्रीमंत होत गेला. या पैशामुळे भाजपला कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करणे
सहज सोपे झाले. हा पैसे कोणी दिला आणि त्यांच्या फायद्यासाठी भाजपने काय केले याची चौकशी
होण्याची गरज आहे अशी त्यांनी यावेळी मागणी केली. निवडणुकीनिधी प्रकरणी पारदर्शकता येण्यासाठी
निवडणूक नियमांमध्ये योग्य ते बदल करण्याची मागणीही शर्मा यांनी यावेळी केली.

नरेंद्र मोदी यांच्या ‘कथनी आणि करनी”मध्ये फार मोठा फरक आहे असे सांगून शर्मा म्हणाले, ‘ वह
बोलते है मगर करते कुछ नही याउलट ‘हम’ (काँग्रेस) करते है मगर बोलते नही’हा भाजप आणि काँग्रेस
यांच्यातील फरक आहे असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी २०१४ साली जनतेला दिलेले एकही आश्वासन
पूर्ण केले नाही त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या जाहीरनाम्यात २०१४ सालचीच
आश्वासने देण्यात आली आहेत ते त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरिबांच्या खात्यात वार्षिक ७२ हजार रुपये
(न्याय) आणि रोजगाराला प्रोत्साहन या प्रमुख बाबींना काँग्रेस प्राधान्य देणार असून जनताही आमच्या या
वचननाम्याकडे गांभीर्याने पाहत आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे नव्हे तर त्या कायद्याचा आढावा
घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे असे स्पष्ट करून शर्मा म्हणाले, जनतेचे लक्ष मूळ समस्यांवरून
हटविण्यासाठी भाजपकडून हा कांगावा करण्यात येत आहे. राष्ट्रभक्ती ही काही एकट्या भाजपची
मक्तेदारी नाही. जी व्यक्ती मोदी किंवा भाजपविरोधी बोलेल ती देशद्रोही असे आता नवे समीकरण झाले
आहे. काँग्रेसचे दोन पंतप्रधान (इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) देशाच्या रक्षणासाठी बळी गेले हा इतिहास
माहित असताना काँग्रेस पाकिस्तानला मदत करीत आहे असा आरोप करायला पंतप्रधान मोदी यांना थोडी
तरी लाज वाटायला पाहिजे होती असेही ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...