‘भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले वाढले’-बी.जी. कोळसे पाटील

Date:

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोट आणि उरी हल्ल्याचे राजकारण करत असून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले वाढल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शनिवारी . ‘पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेले आरडीएक्स देशात आलेच कसे,’ असा सवालही त्यांनी केला.

शहर काँग्रेस व लोकायत संघटनेतर्फे टिळक वाड्यात ‘मोदी सरकारची पाच वर्षे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘लोकायत’चे नीरज जैन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते वसंत मोरे, किशोर शिंदे, ‘इंटक’चे सुनील शिंदे आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे आणि खोट्या आकडेवारीने देशाची अर्थव्यवस्था मातीत गेली आहे. विविध प्रश्नांचा गुंता वाढत चालला आहे. त्यामुळे मोदींना पराभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तत्पूर्वी, नीरज जैन यांनी मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या आर्थिक कामगिरीचे विश्लेषण मांडले. भाजपला लोकशाही, समानता व धर्मनिरपेक्षता नको असून सत्तेच्या माध्यमातून संघाचा अजेंडा राबविला जात आहे. जाती-धर्मांत जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केली जात आहे. दुसरीकडे विकासदर सातत्याने घटत असून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे पाच वर्षांत भाजपने देशाची दुरवस्था केल्याचा आरोपही त्यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

सुनेत्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमचा नव्हे राष्ट्रवादीचा होता विलिनीकरणाच्या सीक्रेटची...

घायवळ टोळीतील मोकाचा फरार आरोपी अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात

पुणे-गुंड निलेश गायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या दोन...

लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या: बाणेर परिसरातील घटना

पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका...