पुणे-मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या अपयशी कारभाराच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीतर्फे आज सोमवार दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वा., टिळक
पुतळा (महात्मा फुले मंडई) ते कै. केशवराव जेधे चौकापर्यंत काळी फित बांधून ‘मुक
मोर्चा’ काढण्यात आला. ‘मुक मोर्चा’ रामेश्वर चौक मार्ग – शिवाजी रोड – खडक
पोलीस स्टेशन – राष्ट्रभुषण चौक – कै. केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट पर्यंत
काढण्यात आला.
सदर मोर्चाचे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी
केले. मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी भाषण करताना शहराध्यक्ष रमेश बागवे
म्हणाले की, ‘मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केलेला आहे. सत्तेत येण्यापूर्वी
पंतप्रधान मोदींनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण करण्यास
मोदी सरकार अपयशी ठरले. मोदी सरकारच्या राजवटीत अनेक ज्वलंत प्रश्न देशापुढे
आहेत. त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळित झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही या उलट
मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांचे २ लाख कोटींचे कर्ज माफ केले. स्वतंत्र
भारताच्या इतिहास पहिल्यांदा मोदी सरकारने कृषी क्षेत्रावर टॅक्स लावला. दरवर्षी २
कोटी तरूणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करू शकले नाही
आणि आता ४ वर्ष सत्ता भोगल्यानंतर मोदी सांगतात की, तरूणांनी पकोडे विकले
पाहिजे. या जुमला सरकारने सांगितले होते की, परदेशात गेलेला काळा पैसा परत
आणून १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात जमा करू. आजपर्यंत एक
नया पैसाही जनतेच्या खात्यात जमा झालेला नाही. राफेल विमान खरेदीमध्ये हाजारो
कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण फेल झालेले आहे.
दररोज पाकिस्तान मधून अतिरेक्याची घुसखोरी होत आहे. या अतिरेक्यांबरोबर
झालेल्या चकमकित ३०० पेक्षा अधिक जवान मारले गेले. चीन डोकलाममध्ये –
आपल्या सैन्यांनसह तळ ठोकून आहेत. आपल्या पंतप्रधानांनी चीनचा दौरा
केला परंतु चीनच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर डोकलाम विषयी चर्चा केली नाही. काश्मिरचा
प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे, विकासदर घटत आहे, इंधन दरवाढीतून
जनतेची लूटमार होत आहे. उनाव आणि कथुआमध्ये महिलांवर बलात्कार झाले.
कथुआच्या आरोपींना मदत करण्यासाठी भाजपचे मंत्र्यांनी पुढाकार घेतला.’
वाढलेल्या इंधनदरवाढीमुळे सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. जनतेला
होत असलेल्या समस्यांचा विचार न करता वस्तूस्थिती जाणून न घेता मोदी सरकार
जाहिरात बाजी करून जनतेची दिशाभुल करीत आहे. येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत
जनता या जुमला सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.’
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. कमल व्यवहारे व
नगरसेवक आबा बागुल यांचीही यावेळी भाषणे झाली. या मोर्चामध्ये माजी आमदार
बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, श्रीकांत शिरोळे, गटनेते
अरविंद शिंदे, संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, अंजनी निम्हण,
नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरू, मनिष आनंद, रविंद्र धंगेकर, अविनाश
बागवे, वैशाली मराठे, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे,
सेवादलाचे रविंद्र म्हसकर, बाळासाहेब दाभेकर, मुकारी अलगुडे, संगिता तिवारी, द. स.
पोळेकर, शेखर कपोते, इंदिरा अहिरे, सुनिल शिंदे, राजू मगर, काका धर्मावत, राजेंद्र
भुतडा, प्रदिप परदेशी, विजय खळदकर, शिवा भोकरे, प्रविण करपे, सतिश पवार,
जयकुमार ठोंबरे, साहिल राऊत, सुनिल पंडित, राजेंद्र पेशने, राजू गायकवाड, भारती
कोंडे, नरसिंह आंदोनी, प्रकाश आरणे, प्रशांत सुरसे आदी सहभागी झाले होते.

