व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन, आगामी निवडणूक प्रत्येक बूथवर लढवू – पृथ्वीराज चव्हाण

Date:

पुणे – विधानसभेची आगामी निवडणूक गेल्या पाच वर्षातील सरकारचा कारभार, भ्र्रष्टाचार, चुकीची आर्थिक धोरणे, विकास यापेक्षाही काँग्रेसच्या गावोगावच्या बूथ कार्यकर्त्यांसाठी ही वैचारिक लढाई आहे. मतदार यादीपासून ते मतदारसंपर्क, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीपर्यंतचे बूथव्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या सूक्ष्म व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यासाठी ही निर्धार कार्यशाळेचे आय़ोजन केले आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्या, बूथ कार्यकर्त्यांना देऊन प्रशिक्षित करून आगामी निवडणूक प्रत्येक बूथवर लढवू या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील प्रत्येक विभागातील निवडक कार्यकर्त्यांसाठी“निर्धार” या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन पुण्यात केले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अन्य राष्ट्रीय चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी वांशी रेड्डी, संपतकुमार, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश सरचिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे समन्वयक अभय छाजेड यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी तिरंगी सुती हार व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केल्यावर पृथ्र्वीराज चव्हाण यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उदघाटन केले.

काँग्रेस पक्षातील नव्या तरूण बूथकार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला निवडणूक, त्यातील सूक्ष्म व्यवस्थापन आणि तंत्राबद्दल प्रशिक्षित करून प्रत्येक बूथवर निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ही कार्यकर्त्या प्रशिक्षणाची संकल्पना राहुल गांधी यांनी मांडली, असे सांगून चव्हाण म्हणाले,  बूथ कार्यकर्त्यांना मतदारयादी, मतदारांशी संपर्क, त्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांची महिती देऊन त्यांच्याशी संवाद साधणे, संपर्क ठेवणे आणि त्यांचे मतदान पक्षाला करून घेणे ते शेवटी मतमोजणी पर्यंत बूथ कार्यकर्त्याने करावयाच्या कामाची सखोल महिती सतत देत रहाणे आवश्यक आहे. अशा कार्यकर्त्यांशी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणा-या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची साखळी तयार करण्याची ही तयारी म्हणजे पशिक्षणासाठी प्रशिक्षक तयार करण्यासाठीची कार्यशाळा आहे.

सध्या सत्तेचा नंगा नाच सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस पक्षाचा कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्यात येत आहे. निवडणुकीत हे सर्व मुद्दे असतीलच पण ते बूथ कार्यकर्त्यांलाही मतदारांच्या घरी जाऊन त्यांना सांगता येणे गरजेचे आहे. कारण ही निर्णायक लढाई असून समाजाच्या भवितव्यासाठीच्या या लढाईतील शिलेदार म्हणून या वर्गातील प्रशिक्षणार्थींची निवड झाली आहे. आपण बथपर्यंत प्रशिक्षित कार्यकर्त्यांची साखळी तयार करून ही वैचारिक लढाई जिंकू असा विश्वास चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सचिन राव म्हणाले, काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला असला तरी आजही पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे. या कार्यकर्त्यांशी संपर्क करणे, त्यांच्या सोबत बैठक घेणे, त्यांना लागणा-या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करणे, त्यांना योग्य सूचना देणे किंवा त्यांच्याकडचे अनुभव जाणून घेणे अशी कामे या वर्गातील प्रशिक्षित कार्यकर्त्यांना करायची आहे. या प्रशिक्षणासाठी आलेले सर्व जण पक्षाचे काम म्हणून नव्हे तर  बूथ कार्यकर्त्यांप्रती आपले असलेले कर्तव्य बजावण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपतकुमार यांनी सांगितले की, आज लोकशाहीवादी काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट आहे. यातून पक्षाला उभारी देण्यासाठी बदलत्या युगात आलेले निवडणूक व्यवस्थापन, बूथ व्यवस्थापन, ईव्हीएमचे तंत्र या सगळ्याची महिती कार्यकर्त्याला असणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. यातून मतदारांपर्यंत पोचून त्यांचे मत काँग्रेसपक्षाकडे आणणे आपले सर्वांचे अंतिम धेय्य आहे.

अभय छाजेड म्हणाले, आजच्या परिस्थितीत जातीयवादी शक्तींविरूद्ध कार्यकर्त्यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी निव़णुकीतील परभावानंतर मलूल झाला कार्यकर्त्याला पुन्हा भक्कमपणे उभे करण्यासाठीही कार्यशाळा आहे. या दोन दिवस चालणा-या कार्यशाळेतील कार्यक्रमांची महिती प्रदेश काँग्रेसचे अमर खानापुरे यांनी दिली. या कार्यशाळेत गुजरातचे उत्तम परमार, डॉ.  भालचंद्र मुणगेकर, सचिन सावंत असे मान्यवर काँग्रेसची वैचारिक बैठक, भ्रष्टाचार, बेरोजगारी, कृषी धोरणे, कायदासुव्यवस्था आणि बूथ कार्यकर्ता अशा विषयांवर महिती देणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षणार्थींमध्ये याच विषयावर ग्रुप डिस्क्शन होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...