‘​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली’, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप(व्हिडीओ)

Date:

लखनऊ-काँग्रेसनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नेते, खासदार साक्षी महाराजांनी केला आहे.भाजपचे नेते, खासदार साक्षी महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साक्षी महाराज यांनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप लावला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एका सभेला संबोधित करत असताना साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला. ‘काँग्रेसनेच अवेळी सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत ढकलेल होते. माझा आरोप आहे की, काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली आहे. हे फक्त त्यांच्या लोकप्रियतेमुळे करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे पंडित नेहरू आणि महात्मा गांधीही फिके पडत होते.’ असे साक्षी महाराज म्हणाले आहेत.शनिवारी देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या दरम्यान साक्षी महाराजांनी हे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रक्त सांडवून आपण स्वातंत्र मिळवले आहे. स्वातंत्र मिळवणे सोपे नव्हते. त्यासाठी सुभाषबाबूंना तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगाचा नारा द्यावा लागला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...