तंत्रज्ञान आणि ज्ञान यांच्या समन्वयानेच संपूर्ण विकास शक्य -धर्मेंद्र प्रधान

Date:

मुंबई, 31 ऑक्टोबर 2021 

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (नीटी), मुंबई चा 26 वा दीक्षांत समारंभ 31 ऑक्टोबर, 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या दीक्षांत समारंभाला केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे आयआयटी कानपूरचे अध्यक्ष  (इस्रोचे माजी  अध्यक्ष) डॉ. के. राधाकृष्णन आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे डॉ. अनिल सहस्रबुद्धे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.या दीक्षांत समारंभात श्री. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तंत्रज्ञान आणि ज्ञान यांच्या समन्वयानेच  संपूर्ण विकास शक्य आहे. नवोपक्रमाचे मॉडेल तयार करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ज्ञान यांच्या समन्वयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन प्रधान यांनी केले. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (नीटी), मुंबई ने भारतातील व्यवस्थापन संस्थांमध्ये  12 वे स्थान मिळवले आहे ही आनंदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. ”जग बदलण्यासाठी शिक्षण हे एक  सामर्थ्यशाली शस्त्र आहे” या नेल्सन मंडेला यांच्या वाक्याचा उल्लेख करत, आपल्या देशातील अव्वल संस्थांमधून पदवी घेतलेल्या स्नातकांनी उद्योजक, संशोधक, व्यावसायिक आणि चांगले मनुष्य होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नव्या भारताच्या उभारणीत बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शिक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहेत, भविष्यातील सज्जतांसाठी आपल्या युवा वर्गाला तयार ठेवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात महत्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत असे ते म्हणाले.

डॉ के राधाकृष्णन म्हणाले की, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाला कशाप्रकारे फायदा होईल यासंदर्भात आणि तंत्रज्ञानाच्या मानवावरील प्रभावाबद्दल देखील विद्यार्थ्यांनी अधिक विचार केला पाहिजे.

डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले,  केवळ संस्थांनाच नव्हे तर व्यक्तींना काय शिकायचे आहे ते निवडण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण स्वायत्तता प्रदान करेल. महामारीच्या काळात 11 युनिकॉर्न जन्माला आले हे भारतीय शिक्षण आणि व्यवसाय प्रणालीची लवचिकता दर्शवते, असे सहस्रबुद्धे पुढे म्हणाले.  उद्योगाशी परस्परसंवाद आणि सहकार्य हे आमची प्रगती  सुलभ करेल यावर राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी  संस्थेचा ठाम विश्वास आहे असे सांगत संस्थेचे संचालक प्रा.मनोजकुमार तिवारी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेने आयआयटी दिल्लीच्या  सहकार्याने कारखानदारीसाठी बहु-संस्थात्मक दूरदर्शी नेतृत्वाची सुरुवात केली असे त्यांनी सांगितले.या दीक्षांत समारंभात औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयई) ची 49 वी तुकडी, औद्योगिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयएम) ची 26 वी तुकडी, औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयएसईएम)ची 19 वी तुकडी, बांधकाम व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविका आणि प्रकल्प व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका  (पीजीडीपीएम) अभ्यासक्रमाच्या 6 वी  तुकडी तसेच पीजीपीईएक्स-व्हीएलएफएम अभ्यासक्रमाची दुसरी /तिसरी तुकडी आणि शिष्यवृत्ती  तुकडीतील स्नातकांना या समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.संस्था 1963 साली  स्थापन झाल्यापासून, औद्योगिक अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनामध्ये विचारशील नेतृत्व करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न करत आहे आणि त्यासोबतच राष्ट्राच्या उत्पादन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनात सहकार्य  करत आहे.सध्या ‘नीटी’ च्या वतीने औद्योगिक अभियांत्रिकी, औद्योगिक व्यवस्थापन, शाश्वत व्यवस्थापन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर स्तरावर केंद्रित शैक्षणिक कार्यक्रम प्रदान केले जातात. यासोबतच शिष्यवृत्ती कार्यक्रमासह एक वर्षाची कार्यकारी पदविका ”पीजीपीईक्स-व्हीएलएफएम” देखील प्रदान  केली जाते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...