चांगल्या कामाचे कौतुक करणारे समाजमन तयार होण्याची गरज :गिरीश बापट

Date:

शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या  उद्यमगौरव आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण 
पुणे :
‘वाईट गोष्टींवर चर्चा करून जगात सर्व वाईटच चालले आहे असे  वातावरण तयार होत असताना  चांगल्या कामाचे कौतुक करणारे समाजमन तयार होण्याची गरज आहे . खोटी नाणी समाजात फिरत राहतात आणि चांगली नाणी खिशात पडून राहतात ,अशा वेळी राजकारणातही चांगली माणसे आली नाहीत तर नको त्या व्यक्तीं पोकळी भरून काढतील ‘ असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले
 शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टचा उद्यमगौरव आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा रविवारी बाल शिक्षण मंदिर (कोथरूड ) येथे  गिरीश बापट आणि डॉ विश्वनाथ कराड यांच्या हस्ते झाला . यावेळी अध्यक्ष स्थानावरून  गिरीश बापट बोलत होते .
या कार्यक्रमात गिरीश कसमळकर (सॉफ्टवेअर क्वालिटी सिस्टिम्स ),गिरीश शहा ,मिलिंद शहा (रमेश डाईंग ) यांना उद्यमगौरव पुरस्कार देऊन आणि सुंदरगिरी महाराज (नदी पुनर्जीवन प्रकल्प ,सेवागिरी महाराज ट्रस्ट ),बस्तू रेगे (संतुलन पाषाण शाळा ) यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून सोहळ्याचे हे 19 वे वर्ष आहे .
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले ,’समाजात चांगल्या बोलणाऱ्या पोपटापेक्षा  वट वाघळांची संख्या वाढत आहे . सरळ जग पण त्यामुळे त्यांना उलटे दिसते . वाईट गोष्टींवर रोज टीका -चर्चा होताना जगात सर्व वाईटच चालले आहे असे  वातावरण तयार होत आहे . सकारात्मकता कमी होत आहे . अशा वेळी   चांगल्या कामाचे कौतुक करणारे समाजमन तयार होण्याची गरज आहे  . कार्यक्रमाचा खर्च करतो ,असे सांगून पुरस्कार देखील मिळवले जात असताना शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट ने समाजात तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन 19 वर्षात वेगळी उंची गाठली आहे .
सर्व सामान्य लोक राजकारणापासून अलिप्त राहतात याकडे लक्ष वेधून ते म्हणाले ,’ चांगल्या व्यक्ती सर्व क्षेत्रात जात असताना राजकारणात मात्र येत नाहीत . राजकारणात लबाड आणि खोटे बोलणारे लोक येतात . मग राजकारण कसे सुधारणार ? राजकारणातही चांगली माणसे आली नाहीत तर नको त्या व्यक्तीं पोकळी भरून काढतील ‘
डॉ विश्वनाथ कराड म्हणाले ,’भारतीय संस्कृती जगाच्या गुरु स्थानी जाणार आहे .भारतीय विचारांचा परिपाक या पुरस्कार वितरणातून ,गुणी जनांच्या  सन्मानातून होत आहे . हे महत्वाचे आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग हा भारतीय विचार जगात प्रसिद्ध केला ही मोठी गोष्ट आहे . भारतीय संस्कृती जगाच्या गुरु स्थानी जाणार आहे ,हेच यातून प्रतीत होत आहे ‘
प्रास्ताविक मोहन गुजराथी यांनी केले . अदिती गुजराथी -सराफ यांनी सूत्र संचालन केले .
यावेळी  डॉ अनंत सरदेशमुख ,जयंत गुजराथी ,कन्हेय्यालाल गुजराथी ,विपुल गुजराथी ,विशाखा गुजराथी ,डॉ चैतन्य सराफ ,डॉ सुभाष देवी ,ज्ञान प्रबोधिनी चे संचालक  डॉ . गिरीश बापट ,पोपटलाल ओस्तवाल ,प्रवीण चोरबोले ,श्याम भुर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार: विश्वास पाठक

मुंबई, 27 मार्च 2026 महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात...

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...