Industrialist

कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार,19 डिसेंबर 2024 पासून सुरू

· प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 665 रुपये ते 701  रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.   · बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि...

टायटनने ४० व्या वर्धापन दिनी ‘युनिटी वॉच’ सादर करून विंग कमांडर राकेश शर्मा यांना केले सन्मानित 

बेंगलोर - उत्कृष्टतेची परंपरा जपत असल्याला ४ दशके पूर्ण करत टायटन वॉचेस आपला ४० वा वर्धापन दिन भारताच्या एका सर्वात अभिमानास्पद टप्प्याचा सन्मान करून साजरा करत आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक सफारीचा सन्मान टायटन वॉचेस आपल्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त करत आहे. १९८४ साली सोविएत अंतराळयान सोयूझ टी-११ मधून अंतराळात झेप घेऊन श्री शर्मा यांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले, अंतराळातून भारत कसा दिसतो आहे याचे उत्तर देताना त्यांनी उच्चारलेले "सारे जहाँ से अच्छा" हे शब्द म्हणजे जणू देशाच्या शिरपेचावरील मानाचा तुरा आहेत. त्यांचे हे एक उत्तर कोट्यावधी देशवासियांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले, या एका वाक्याने अवघ्या जगाला एकजूट भारताचे दर्शन घडवले. ४० वर्षांनंतर स्वतःचा कारीगरी आणि नाविन्याचा वारसा साजरा करत असताना, टायटन ब्रँडने लॉन्च केले आहे 'युनिटी वॉच', सेलेस्टीयलपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा लिमिटेड-एडिशन मास्टरपीस भारताची ही अतुलनीय गाथा सन्मानपूर्वक आपल्यासमोर मांडतो. एकता आणि अमर्याद संधी - अंतराळामधून पृथ्वीकडे पाहताना श्री शर्मा यांच्या मनात उमटलेल्या या भावनांपासून प्रेरणा घेऊन टायटनने 'युनिटी वॉच' तयार केले आहे. मानवतेची स्वप्ने आणि एकतेने गुंफलेले भविष्य यांनी एकत्र आलेल्या जगाचे व्हिजन या नावामधून दर्शवण्यात आले आहे. लिमिटेड एडिशन युनिट वॉचचे फक्त ३०० पीस बनवण्यात आले आहेत. लुपा, बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या, एका विशेष हृदयस्पर्शी सोहळ्यामध्ये टायटनने या कलेक्शनमधील पहिले युनिटी वॉच विंग कमांडर राकेश शर्मा यांना दिले. यावेळी श्री शर्मा यांनी अंतराळवारीच्या थरारक आठवणी सांगितल्या, अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या  विहंगम रूपाचे पुन्हा वर्णन केले. सीमांच्या पलीकडे जाऊन 'वसुधैव कुटुम्बकम' या विचाराची आठवण करून देणारा त्यांचा दृष्टिकोन सर्वांना प्रेरित करणारा ठरला. टायटनच्या डिझाईन टीमने हे विशेष घड्याळ तयार करण्यामागची नाजूक, तपशीलवार प्रक्रिया समजावून सांगितली. अंतराळ यात्रा आणि घड्याळ बनवण्याची प्रक्रिया या दोन्हींमध्ये अचूकता व अभियांत्रिकी ज्ञान, कौशल्ये अत्यंत गरजेची असतात. या सर्व चर्चांनी अवघे वातावरण प्रेरणादायी बनले, सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला. टायटनचे वॉचमेकिंग आणि अंतराळ संशोधनात भारताने केलेली अचाट प्रगती या दोन्हींमधून "मेक इन इंडिया" अधोरेखित झाल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले. टायटन वॉचेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीएसएमओ श्री राहुल शुक्ला यांनी सांगितले, "गेली चार दशके टायटनने तयार केलेल्या प्रत्येक घड्याळामध्ये "भारत" अंतर्भूत आहे. यावर्षी आम्ही विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत, एकजूट भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा दर्शवणारी ही घटना देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आमच्या इन-हाऊस टीमने तयार केलेले युनिटी वॉच नावीन्य आणि 'मेक इन इंडिया' ची कलात्मकता दर्शवते. हे घड्याळ अंतराळ, विज्ञान यांचा सन्मान करते, समृद्ध भारतीय परंपरा दर्शवणारी घड्याळे तयार करण्यात उचललेले पुढचे पाऊल म्हणजे हे घड्याळ आहे. हे कलेक्शन लॉन्च करून आम्ही भारताच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षा दर्शवणारी घड्याळे तयार करण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत." विंग कमांडर राकेश शर्मा म्हणाले, "अंतराळातून जेव्हा आपण पृथ्वीकडे पाहतो तेव्हा काळाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा वरून पृथ्वीकडे पाहिले तेव्हा मला कोणत्याच सीमा दिसून आल्या नाहीत, दिसली ती एक सुंदर, एकजूट पृथ्वी. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या सुंदर घराचे संरक्षण करण्यासाठी सहकार्याऐवजी संघर्षाला प्राधान्य देणारे सामाजिक मॉडेल कालबाह्य झाले आहे, ते बाजूला सारण्याची वेळ आली आहे. युनिट वॉचेसमध्ये टायटनने हा विचार इतक्या चपखलपणे आणि कुशलतेने मांडला हे पाहून मला खूप आनंद झाला. याच्या सेलेस्टीयल डायलमध्ये मला आपला प्रिय भारत दिसतो, घड्याळावरील कोरीवकाम आठवण करून देते की, आपण वेळ सेकंदांमध्ये मोजतो पण प्रगतीचे मोजमाप हे आपल्याला लाभलेल्या शांततेतून केले पाहिजे. हे घड्याळ अंतराळातील प्रवासाची आठवण करून देते, इतकेच नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये असलेली, ताऱ्यांना कवेत घेण्याची क्षमता देखील दाखवून देते." युनिटी वॉचमध्ये टायटनने कलात्मकता आणि नावीन्य यांची नवी व्याख्या रचली आहे, पहिले कन्सील्ड ऑटोमॅटिक घड्याळ म्हणजे अतुलनीय शान आणि क्रांतिकारी डिझाईनचा मास्टरपीस आहे. आकर्षक मिडनाईट ब्ल्यू रंगाची डायल अतिशय बारकाईने चित्रित करण्यात आलेला भारत दर्शवते, विंग कमांडर राकेश शर्मा यांना अंतराळातून दिसलेल्या भारताचे विहंगम दृश्य इथे पाहायला मिळते. देशभक्तीचे तीन रंग केशरी, सफेद आणि हिरवा काट्यांवर ठळकपणे दिसतात. सेकंद काट्याचा आकार रॉकेटसारखा आहे, श्री शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीचे आणि निग्रही शोधाचे हे प्रतीक आहे. या सगळ्याचा मानबिंदू आहे श्री शर्मा यांचे ऐतिहासिक वाक्य "सारे जहाँ से अच्छा" या घड्याळाच्या मागे कोरण्यात आले आहे. त्यासोबतच ती ऐतिहासिक तारीख देखील नमूद करून भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा व यश यांचा सन्मान करण्यात आला आहे. निवडक टायटन स्टोर्समध्ये आणि ऑनलाईन खरेदीसाठी हे घड्याळ उपलब्ध असल्याची घोषणा करून टायटनने देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण कायम आपल्यासोबत ठेवण्याची संधी घड्याळप्रेमींना दिली आहे.

*केएसबी लिमिटेडच्या कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या स्टॉल्सना किसान प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : मोशी येथे 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या ,किसान प्रदर्शनामध्ये केएसबी लिमिटेडने कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक सादर...

भारताची पंच्याहत्तरी आणि शंभरी – भविष्यातील प्रवास

मुंबई, १३ डिसेंबर २०२४ – ललित दोशी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने ३०वे ललित दोशी स्मृती व्याख्यान मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रात पार पडले. १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या व्याख्यानमालेत हे शेवटचे व्याख्यान होते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि आयसीआयसीआय बँकेचे माजी अध्यक्ष के.व्ही. कामत व सीएनबसी टीव्ही १८च्या व्यवस्थापकीय संपादिका शेरीन भान यांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ‘भारताची पंच्याहत्तरी आणि शंभरी-पुढचा प्रवास’ या मूळ संकल्पनेवर आधारित भारताचा १९९० च्या प्रारंभापासून ते २०४७ पर्यंतचा अपेक्षित प्रवास या विचारांवर तज्ज्ञांनी आपापली मते मांडली. आपल्या व्यावसायिक करिअरमधील आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभवांच्या आधारावर के.व्ही.कामत यांनी देशाच्या आर्थिक उत्क्रांतीबद्दल तपशीलवार माहिती दिली. १९९०च्या सुरुवातीला देशात बदलांचे वारे वाहू लागले होते. त्याच वेळी आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना होऊ लागली होती. उदारीकरण आणि तंत्रज्ञानाचा सढळ हस्ते वापर करत, देशात पायाभूत सोईसुविधांची वाढ होत गेली. ही वाढ २००० सालीच्या सुरुवातीला तत्परतेने केली गेली, हा विचार त्यांनी मांडला. या काळात प्रगतीचा कालखंड लक्षात घेतल्यास विकास हा झपाट्याने घडत गेला. त्याच वेळी विविध प्रकल्पांच्या पायाउभारणीतील पर्यावरणीय नियमावलींच्या मर्यादा ते बाजारपेठेतील मंदीपर्यंत कामत यांनी चिंता व्यक्त केली. हे सर्व घटक भारताच्या आर्थिक विकासासमोरील मोठी आव्हाने असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. येत्या २५ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास विविध घटकांवर विकास करण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. ० पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण - २००० साली पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली. आता या पायाभूत सुविधांच्या जोरावर सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढायला हवा. सौरऊर्जा किफायतशीर दरात उपलब्ध आहे, ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढायला हवी, असे ते म्हणाले. रस्ते आणि दूरसंचार सेवांमध्येही विकास घडविला, तर आर्थिक विकासाचा पाया स्थिर होईल, असेही त्यांनी सूचविले. ० औद्योगिक क्षेत्र आणि मालाच्या निर्मितीचा व्यवसाय वाढण्यावर भर - मालाचे उत्पादन बाजारात तत्काळ उपलब्ध करून द्यायला हवे. मालाच्या उत्पादनातील स्पर्धा वाढल्यास बाजारात असंख्य स्पर्धक निर्माण होतील. माल उत्पादन निर्मितीत मूल्य साखळी तयार झाल्यास रोजगारनिर्मितीला हातभार लागेल. भारत जागतिक बाजारपेठेत मालपुरवठा करणारे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. ० तांत्रिक झेप आणि डिजीटल भारत - १९९०च्या सुरुवातीला मोबाइल तंत्रज्ञानाचे भारतात आगमन झाले. त्यानंतर, भक्कम फिनटेक प्रणालीचा विकास घडला. तंत्रज्ञान आणि डिजिटल उद्योगाच्या विकासामुळे जलद गतीने विकास घडला. याबद्दलही कामत यांनी आपले विचार मांडले. येत्या दशकांत डिजिटल माध्यमांतील उत्क्रांतीमुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात किमान दोन टक्क्यांनी वाढ होईल. परिणामी, दोन अंकी विस्ताराचा मार्ग मोकळा होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ० सामाजिकीकरण आणि ग्रामीण-शहरीकरणाचे एकत्रिकरण - कामत यांच्या मते, ग्रामीण भारताच्या समुद्धीने भविष्यातील प्रगतीचा पाया रचला जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण-शहरीकरणातील भेदभाव मिटविणे, कामाचा दर्जा वाढविणे, तसेच बाजारातील पुरवठा साखळी वाढविणे इत्यादी घटकांवर भर दिल्यास सर्वसमावेशक विकास घडविता येईल, तसेच न्याय वाढीला चालना मिळेल. या सर्व मुद्द्यांसह विचारविनिमयाने केलेल्या वित्तीय योजना आणि धोरणांवर लक्ष केंद्रित केल्यास येत्या २५ वर्षांत देशाच्या आर्थिक विकासात भरभराट होईल, असा दृढ विश्वास कामत यांनी व्यक्त केला. आर्थिक उलाढालीत कर्जदारीच्या प्रक्रियेत व्याजदर कमी राहिल्यास चलनवाढ नियंत्रणात राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. देशाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्व वाढल्यास चलनवाढ नियंत्रणात आल्यास अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होईल. भारत आर्थिक महासत्ता म्हणून जगभरात ओळखला जाईल, असा सकारात्मक दृष्टिकोन कामत यांनी आपल्या भाषणातून दिला. या व्याख्यानमालेला प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक, दीपक पारेख, राजदूत विजय नांबियार, डॉ.अशोक गांगुली, नादिर गोदरेज आणि आनंद महिंद्रा या नामवंत उद्योगपतींनी हजेरी लावली. या व्याख्यानमालेत ललित दोशी मेमोरिअल फाउंडेशनचे विश्वस्त भरत दोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘यंदाच्या व्याख्यानमालेत भविष्यातील परिवर्तनवादी दृष्टिकोन मांडला गेला. हा परिवर्तनवादी दृष्टिकोन ललित दोशी यांच्या विचारांना प्रेरणा देणा-या भावनेशी सुसंगत आहे. हा परिवर्तनवादी विचार भारताचे धोरणकर्ते, उद्योगपती आणि नागरिकांना मार्गदर्शन करणारा ठरेल. आम्ही सर्व एकसंघिक होत पूर्ण विकसित देशाकडे वाटचाल करण्यास सज्ज आहोत.’’

भारत, युरोप आणि जीसीसीमध्ये दोन नवीन लो-फ्लोर इलेक्ट्रिक सिटी बस – SWITCH EiV12 आणि E1 

नितिन गडकरी यांनी भारत आणि जगासाठी स्विच इलेक्ट्रिक बसच्या नवीन बसेसचे केले औपचारिक अनावरण चेन्नई – अशोक लेलँडची सहायक कंपनी आणि हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या, तसेच इलेक्ट्रिक...

Popular