पुणे- मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांला फुटला. दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले . अनेक घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आणि अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. डागडुजी न झाल्याने कालव्याची भिंत कोसळ्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान दुपारी बीन पावसाच्या पुराने पुण्याचा हा परिसर हैराण झाला असताना संध्याकाळी पुण्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्याने शहरात सकाळपासूनच वाहतूकव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली . माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.आणि कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला .डागडूजी साठी 2 कोटी रुपये खर्चाच्या कामाला अतिविलंब केल्याने, ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले.
कालव्याची भिंत कोसळल्याने 40 ते 50 हजार लोकसंख्येच्या वस्तीत पाणी शिरले आहे. ज्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे, त्या भागात पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.
खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात या कालव्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो. कालव्याची तातडीने डागडुजी करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापाैर मुक्ता टिळक या दांडेकर पुल परिसरातील जनता वसाहतीत अाल्या असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घालत अाम्हाला नुकसान भरपार्इ काेण देणार, अामच्या मदतीला वेळेला प्रशासनाचे काेणीच धावून अाले नाही असे सांगत तक्रारींचा भडिमार केला. टिळक यांनी याप्रकरणी मनपाने वारंवार पाटबंधारे खात्यास सूचना दिल्या हाेत्या असे सांगत सध्या अाप्तकालीन परिस्थीतीशी सामना करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. लाेकांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून सर्व लाेकप्रतीनिधींनी मिळून त्यावर उपाययाेजना करु असे स्पष्ट केले अाहे. कालव्याशी संबंधित काेणत्या तृटी राहिल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवार्इ केली जार्इल असे त्यांनी सांगितले.
गळती वाढत गेल्याने घटना घडली
मुठा उजवा कालवा नेमका ज्याठिकाणी फुटला त्याबाबतची पाहणी केल्यावर खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, कालव्याच्या भिंतीच्या विविध ठिकाणी गळती हाेत असून सदर गळती याठिकाणी वाढत जाऊन कालवा फुटला अाहे. पुण्याचे पाणी पुरवठयावर ही या दुर्घटनेमुळे परिणाम हाेणार अाहे. खडकवासला धरणातून निघाल्यानंतर हा कालवा पर्वती जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत येताे. तिथपर्यंत पाणी घेता येर्इल मात्र, त्यापुढे पाणी नेता येणार नाही. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून पुण्यातील ज्या भागाला पाणी जाते ताे भाग वगळुन उर्वरित भागाला पाणीपुरवठा करता येणार नाही. पर्वती जलशुध्दीकरण केंद्रानंतर पाणी कॅन्टान्मेंट जलशुध्दीकरण केंद्र व इतर केंद्रात जात असते, मात्र कालवा फुटल्याने तिथपर्यंत पाणी पाेहचवता येणार नाही.
जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, “”खडकवासला धरणातून शहरासह जिल्ह्यासाठी पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुणे शहराच्या लष्कर व पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 365 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू असतो. त्यामुळे त्याठिकाणी कोणतीही दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही. जनता वसाहतीच्या लगतच्या कालव्याला 10 मीटरपेक्षा कमी रुंदीचा मातीचा भराव वाहून गेला आहे.
कालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च केला नाही
माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे दुष्काळी भागाला तसेच शेतीला पाणीपुरवठा केला जाताे. कालव्याची डागडुजी करण्याकरिता दाेन काेटीचा खर्च करणे अपेक्षित हाेते मात्र, ताे सरकारने न केल्याने ही दुर्घटना घडली. भाजपच्या गलथन कारभारचा पुण्यातील नागरिकांना फटका बसला असून लाेकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले अाहे त्याची नुकसान भरपार्इ शासनाने द्यावी. लाखाे लिटर शेतीचे व पिण्याचे पाणी या दुर्घटनेमुळे वाया गेले असून त्याला काेण जबाबदार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सत्ताधारी भाजप मध्ये प्रशासनाकडून काम करुन घेण्याची धमक नसल्याची खरमरीत टिका त्यांनी याप्रसंगी केली.

