Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बीव्हीजी लाईफ सायन्सेस म्हणजे कृषी विस्ताराचे विद्यापीठ : चंद्रकांत दळवी

Date:

पुणे :
बीव्हीजी लाईफ सायन्सेस नावाची कंपनी कृषी विस्ताराचे विद्यापीठ असल्याचे मत माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी व वितरकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, उमेश माने, दिप शुक्ला, बी.टी. गोरे, गणेश लिमये व भालचंद्र पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, कृषी विद्यापीठे शेती संशोधन व कृषी विस्ताराचे कार्य करतात. त्याच प्रमाणे बीव्हीजी लाईफ सायन्सेच काम सुरु आहे. गेल्या ३ वर्षात बीव्हीजी लाईफ सायन्सेसने कृषी विद्यापीठांपेक्षा अधिक चांगली कामगिरी बजावली आहे.
कृषी विस्ताराला विपणनाची जोड देण्यात बीव्हीजीला यश मिळाले आहे. बीव्हीजीचे शास्त्रज्ञ हेच बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या पाठीचा कणा आहे.
बीव्हीजीने देशाची प्रगती करण्यासाठी ग्रामिण भागातील शेती अधारित गुंतवणूक वाढवली आहे.त्यामुळे बीव्हीजीने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिल्याने त्यांनी शेतकऱ्यांची विश्वासहार्ता जिंकली आहे. विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी बीव्हीजीने पुढाकार घेतला आहे. यापुढे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची चिंता राहिली नाही.
या वेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, ‘ बीव्हीजी लाईफ सायन्सेसने विष मुक्त शेती व निरोगी भारत घडविण्याची चळवळ देशात सुरु केली आहे. चळवळीला बळ देण्यासाठी यंदा नव्याने ३ हजार कृषी पदवीधरांची भरती बीव्हीजीमध्ये करणार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीसाठी खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहेत. हे शेतीसाठी व माणवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.  शेतकऱ्यांनी प्रथम माती व पाणी परिक्षण करुन घ्यावे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. यापुढे प्रत्येक शेतकरी व नागरिकाने विषमुक्त शेतीसाठी प्रचार व प्रसाराबरोबर प्रत्यक्ष अनुकरण करावे. वाढलेले आजार हे आहारातून होत आहेत म्हणून आता पुन्हा सेंद्रीय उत्पादन अर्थात विषमुक्त शेतीकडेच वळले पाहिजे. तरुणांना बाहेरच्या देशात नोकरी व व्यवसायासाठी मोठी संधी आहे. प्रत्येकाकडे एक वेगळे कौशल्य आहे. त्याचा वापर करा. कौशल्य आधारित शिक्षण घेत व्यवसाय करा. यश नक्की मिळेलच संघर्ष जीवनाला घडवत असून भारत निर्माण कंपनी ही शेती, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात मोठे काम करत आहे. नव्याने अनेक योजना राबवून देतांना सुमारे दहा कोटी जनतेच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे संचालक गणेश लिमये यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता पोफळे यांनी केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे कृषी विभागाचे प्रमुख भालचंद्र पोळ यांनी आभार व्यक्त केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

टॉप-8 कंपन्यांचे मूल्य ₹79,130 कोटींनी घटले:रिलायन्सचे मार्केट कॅप ₹20,434 कोटींनी वाढले

मुंबई बाजार मूल्यांकनाच्या दृष्टीने, देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 8...

खरगे म्हणाले, “भाजपचे लोक गांधी, नेहरू आणि आंबेडकरांवर हल्ला करतात,या देशद्रोह्यांना हटवले पाहिजे

नवी दिल्ली- "काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "भाजप...

महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज

मुंबई, १ ४   डिसेंबर २०२५: देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने...