मुंबई-देवाने आपल्याला एकसारखे बनवले आहे. भगवान राम हिंदुचेच नाही तर ते विश्वाचे दैवत आहेत. इंग्रज, रशियनांचेही ते देव आहेत. पण आज जाती-धर्मात फूट पाडली जात आहे, असे असले तरीही आपण फक्त भारतीयच आहोत हेच आपण मानायला हवे असे वक्तव्य काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीतर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ‘अमृत महोत्सव’ सोहळ्यात ते बोलत होते.
फारुक अब्दुल्ला म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताला मजबूत करावे लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. मी एक गोष्ट विचारतो की, आपली भाषा, पंथ, जात आणि चालिरिती वेगवेगळ्या आहेत. भौगोलिक स्थिती राहणीमान वेगळे परंतु, आपल्याला एकत्र ठेवणारी अशी कोणती शक्ती आहे. ते म्हणजे आपण एकत्र येऊनच भारत बनवू शकतो, त्यात मित्रत्व महत्वाचे असते या गोष्टींमुळेच आपण सर्व राज्यातील लोक वेगवेगळे असूनही एकत्र आहोत.
फारुक अब्दुल्ला म्हणाले, मी विचारतो की, रुग्ण रुग्णालयात असेल आणि त्याला रक्ताची गरज असेल तर रुग्ण विचारत नाही की, ते रक्त दलितांचे आहे, की, हिंदु, मुस्लिमांचे वा शिखांचे आहे. रुग्ण फक्त रक्ताचाच विचार करतो.
एक औषधी हिंदु खातो ती मुस्लिमही खातो अन् शिखही पण ती बनवणारा कोणत्या धर्माचा आहे हे कधीच आपण पाहत नाही. देवाने आपल्याला एकसारखे बनवले आहे. भगवान राम हिंदुचेच आहेत का ते तर विश्वाचे दैवत आहे, इंग्रज, रशियांचेही आहेत. पण आपण लोक आज जाती-धर्मात फूट पाडली जात आहे, आपण हे सांगत नाही की, आपण भारतीय आहोत.
आपण मजबूत होऊया
फारुक अब्दुल्ला म्हणाले, आम्ही नमाज अदा करतो कुणासमोर अदा करतो एकाच देवतेसमोर आपण आपसांत लढत आहोत त्यामुळे देश कमजोर बनत आहे. आपल्याला एकत्र यावे लागेल तेव्हाच भारत मजबूत होऊ शकतो.
फारुक अब्दुल्ला म्हणाले, आज महागाई वाढली. सर्व वस्तूु महागल्या. पुढे काय होईल हे आज दिसत नाही. पण देवाला कधी सोडू नका. अल्ला आणि भगवानच आपल्याला समस्यांतून सुखरूप बाहेर काढेल. रावणात एवढी ताकद आणि ज्ञानवंत होता पण त्याला गर्व झाला तेव्हा देवाच्या मर्जीनेच सीतेला पळवून नेले आणि या रावणाचा रामाने संहार केला.
फारुक अब्दुल्ला म्हणाले, आपल्याला एकत्र राहावे लागेल त्यानंतरच आपण मजबूत राहू हेच मी सांगण्यासाठी आणि भुजबळांना शुभेच्छा देण्यासाठीच आलो. जीवन येथेच आणि मृत्यूही येथेच याशिवाय कुठे जाणार. आपल्यात आपण भाईचारा ठेवू. माझ्यासोबत तुूम्हीही जयहिंदचा नारा द्या.

