राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष-गिरीश बापट

Date:

पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे. एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा पक्ष आता स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन  राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे.” असा घणाघात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत स्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या पुण्यातील सरदार घराण्यांचा वंशजांचा कोथरूड येथे मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात सरदार घराण्यांनी पुणे शहर लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट  तसेच बारामती मतदार संघातून कांचन कुल यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला.
बापट म्हणाले की, छत्रपतीं शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्म, वंश अशा कोणत्याच भेदभावाला थारा न देता स्वराज्यातून सुशासनाचा आदर्श मांडला.  परंतु, विरोधक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीय राजकारण करत आहे. छत्रपतींच्या नावाने जातीचे राजकारण म्हणजे त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करण्यासारखे आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांना आम्ही आदर्श मानतो. याचा त्यांना मात्र त्रास होतो. शिवाजी महाराजांचे नाव आम्ही घेतल्यावर यांच्या पोटात का दुखते? असा सवाल ही बापट यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, जातीयवाद ही समाजाला लागलेली कीड आहे.  जातीय प्रवृत्तीमुळे देशाचे नुकसान होते. देशाला विकासाच्या राजकारणाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांची मात्र ह्यांनी जात काढली. छत्रपतीं शिवाजी महाराजांचा आदर्श समोर  ठेऊन समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तसेच आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीच भेदभाव केला नाही. म्हणूनच अठरा पगड जातीचे वर्चस्व असणाऱ्या कसबा मतदार संघातून ५ वेळा मी निवडून येऊ शकलो. ज्या सरदारांनी स्वराज्याच्या स्थापनेत योगदान दिले त्यांचे नाव घेताना सुद्धा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही बापट यावेळी म्हणाले.
 मेळाव्यात सुनील मारणे, सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरकार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, वीर सरदार मानाजी पायगुडे, सरदार मानाजी पायगुडे, सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढेरे, सरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार त्र्यंबकराव नाईक निवांगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार कडू शिक्केकरी, सरदार अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, राजगड सरनोबत सिधोजी थोपटे, सरदार शितोळे सरकार, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत पवार घराणे,श्रीमंत दामाजीराव गायकवाड सरकार,श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार,गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद अंगरक्षक जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, राजेश्री सरदार हांडे, स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस, सरदार काळे, धैर्यवीर शिवले, वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्या सारंग सरखेल, कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे,श्रीमंत सरदार गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव ) श्रीमंत सरदार लुखाजीराव घारे, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर, पायदळ सरनोबत पिलाजी गोळे, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के,  श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला,श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत दामाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार,गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद अंगरक्षक जीवाजी महाले,सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे,सरदार मल्हारजी तुकोजी निगडे,राजेश्री सरदार हांडे,श्रीमंत सरदार भोईटे, स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस, सरदार काळे, धैर्यवीर शिवले, वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्यासह  माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार रंजना कुल,  शरद ढमाले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक सुशील मेंगडे, दिलीप वेडे पाटील, दीपक पोटे, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, जयंत भावे, छाया मारणे, शैलेश जोशी आदी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...