भाजपा -राष्ट्रवादी साथ साथ : विशेष विषयासाठी खास सभा

Date:

खडकवासल्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नगरसेवकाची नाराजी

पुणे- राज्य असो , देश असो, या दोन्ही स्तरावर एकमेकांच्या आमने सामने शड्डू ठोकत असलेले भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आज पुणे महापालिकेत मात्र एकमेकांच्या हातात हात घेऊन खास सभा घेत आहेत. हि खास सभा कोथरूड च्या शिव सृष्टीसाठी नाही , महापालिकेत कंत्राटी स्वरूपात कामगार भरती बंद करून थेट कायम पद्धतीने भरती करण्यासाठी नाही, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून स्टॉल , हातगाडीचे परवाने देण्यासाठी नाही , वा उद्योग उभारून देण्यास मदत करण्यासाठी नाही, सर्वांना समान पाणीपुरवठा आणि मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी नाही , मुंबई महापालिकेप्रमाणे ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना नो मिळकतकर अशा धोरणासाठीही नाही.मग तरीही दाखवायला काही तरी असणारच अशा विषयांना राजकीय दृष्टीने पुढे करत आणि प्रत्यक्षात वेगळी बाजी मारून जायला काही तरी असणारच अशा धूर्त दृष्टीने मागे दोन विषय ठेवत हि खास सभा आयोजित करण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी साथ साथ आल्याचे दिसून येते आहे.

खास सभा बोलवायला ६ सदस्यांची मागणी लागते त्यात ४ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत तर २ महिला सदस्य भाजपच्या आहेत . वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे या भाजपाच्या आणि नंदा लोणकर ,अमृता बाबर ,प्रदीप गायकवाड ,सुनील गायकवाड हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत . अनेकदा असे होते कि नेत्यांच्या सांगण्यावरून फक्त काही सदस्य सह्या करतात असे नंतर स्पष्ट होते यात तसे काही झाले असल्यास अद्याप समजलेले नाही.मात्र या प्रकरणावरून खडकवासल्यातील एक तरुण आणि उत्तम जनसमर्थ पाठीशी असलेल्या नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर उच्च क्षमता द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या मार्गात बदल का करावा ?

या खास सभेत दोन विषय खास आहेत.त्यातील एक विषय एचसीएमटीआर च्या मार्गिकेत बदल सुचविणारा आहे. महापालिकेच्या १९८७ च्या डीपी प्रस्तावामध्ये एचसीएमटीआर प्रस्ताव तयार करण्यात आला .सादर प्रस्तावात बाधित होणाऱ्या इमारतींचा विचार करून मार्गिका करण्यात आली होती.पण त्या सुधारित आखणीनुसार देखील आता स्वारगेट येथील पर्वती सर्वे नंबर ३३ अ /२ सिटी सर्वे नंबर ६६१५ फायनल प्लॉट नंबर ४९० (पैकी ) हि मिळकत बाधित होत असल्याने सदरचा रस्ता उत्तर दिशेकडे सरकवून करावा असा भाजपच्या एका वरिष्ठ नगरसेवकाचा प्रस्ताव आहे .

तर दुसरा खास विषयदेखील असा आहे कि ,’याच एचसीएमटीआर च्या मार्गिकेत ३ ठिकाणी बदल करणार आहे. कोथरूड गांधी लॉन्स ते अलंकार पोलीस चौकी दरम्यान मार्गिकेत बदल करणे तसेच वडगाव शेरी येथे बदल करणे आणि तसेच सर्वे नंबर २२७ /ए /२२७ /१ ते १७ लोहगाव येथील मार्गिकेत बदल करणे असा आहे मात्र हा विषय महापालिका आयुक्तांनी आणलेला आहे असे सांगण्यात येते आहे.

आता दाखवायचे पण छोट्या महत्वाचे विषय

चालू आर्थिक वर्षात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मिळकत कर भरण्यास ५ ते १० टक्के सवलत ३१ मी अखेर पर्यंत देण्यात आली होती ती एक महिना वाढवावी .दुसरा विषय अर्थात चांगला आहे तो असा आहे कि कोरोना महामारी मुळे लायसन धारक पथारी स्टॉल , हातगाडी यांचे शुल्क मार्च पासून सहा महिन्यांपर्यंत माफ करावे .हा विषय शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांचा आहे. तिसरा विषय पश्चात मन्यते साठी आलेला आहे , म्हणजे पूर्वीच त्याची अंमलबजावणी झालेली आहे तो असा कि ,कोविद १९ प्रतिबंध सुरक्षा कवच योजनेस मान्यता द्यावी ,कोरोना रुग्णांवर उपचार करताना अगर अशा रुग्णांशी थेट संपर्क येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोन होऊन त्यांचा मृत्यू झाला तर त्यास या योजनेचा लाभ व्हावा . अर्थात या योजनेबाबत हि अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेतच .

खास सभा कशासाठी ?

या खास सभेवर जे विषय आहेत ते कार्यपत्रीकेवरील विषय आहेत , खास सभा हि आत्यंतिक तातडीच्या अथवा आत्यंतिक महत्वाच्या विशेष विषयांवर बोलविली जाते . मात्र या सभेतील विषय हे खास सभेसाठी पात्र होऊ शकतात काय ?हा देखील प्रश्न उपस्थित होऊ पाहत आहेच .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...