सासवड -कधी काळी लोक सायकल, रिक्षा भाड्याने घ्यायचे. आता चक्क रेल्वे इंजिन भाड्याने घेतले आहे. याचे कारण म्हणजे बंद पडत चाललेली बारामतीची गाडी पुढे न्यायची आहे. पण ते इंजिन कोळशाचे आणि चित्रातले आहे. त्यामुळे कॅप्टन पवार आता राखीव खेळाडूच्या भूमिकेत आहेत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. आपल्या एकूण भाषणात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लक्ष करत त्यांच्यावर जोरदार टीका केली .
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी सासवड येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी कांचन कुल, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी सासवड येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी कांचन कुल, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘पंतप्रधान मोदींनी देशात गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची आघाडी लागत नाही, तर ५६ इंचाची छाती लागते हे मोदींनी अनेक निर्णयाद्वारे जनतेला दाखवून दिले आहे. मोदी म्हणाले होते ते खरे आहे, पवार साहेबांना हवेचा अंदाज चांगला समजतो. त्यामुळे त्यांनी माढ्यातून माघार घेतली. देशात मोदींची हवा आहे हे लक्षात आल्याने ते सध्या मुलीसाठी व नातवासाठीच फिरत आहेत. ४८ जागांची काळजी त्यांनी सोडली आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी माढा आणि बारामती, मावळ आम्हीच जिंकणार असल्याचा दावा केला.
कुल म्हणाल्या, ‘पुरंदरची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. इथे लग्नासाठी कोणी मुली देत नव्हते. ती ओळख आता युती सरकारने पुसली असून, जलयुक्त शिवारसारखी कामे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, गुंजवणी प्रकल्प शिवतारे यांच्या माध्यमातून केला आहे. कुल कुटुंब नेहमी बंड करण्यासाठी परिचित आहे. माझ्या उमेदवारीचे हे बंडच आहे. त्यात मी यशस्वी होणार आहे.’
‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,’ अशी शिफारसही आम्ही केंद्राकडे केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘पुरंदर’साठी आकर्षक पॅकेज
‘पुरंदरमधील नियोजित छत्रपती संभाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ‘समृद्धी’प्रमाणे शेतकरी-जमीन मालकांशी चर्चा करूनच पूर्ण करणार आहे. त्याचे आकर्षक पॅकेज आणि जमीन संपादनासाठी लागणारी तरतूदही केली आहे. हे विमानतळ म्हणजे पुरंदरच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरंदर विमानतळाबाबत भाष्य केले.
‘जेजुरीचा २५० कोटींचा आराखडा’
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीचा विकास करण्यासाठी सरकारने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार केला आहे. आचारसंहिता असल्याने बोलणे योग्य नाही. पण खंडेरायाचा आशीर्वाद आम्ही मिळवणार आहोत, तसेच ६५०० हेक्टर जमिनीवर जेजुरी ‘एमआयडीसी’चे विस्तारीकरण होऊ घातले आहे. त्यामुळे शेकडो आंतरराष्ट्रीय उद्योग येथे येत आहेत. त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांना होणार आहे. सासवड शहराची ५८ कोटी रुपये खर्चाची भुयारी भूमिगत गटार योजना दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना १५ वर्षांत मंजूर केली नाही. ती मी पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या रेट्यामुळे मंजूर केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कुल म्हणाल्या, ‘पुरंदरची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. इथे लग्नासाठी कोणी मुली देत नव्हते. ती ओळख आता युती सरकारने पुसली असून, जलयुक्त शिवारसारखी कामे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, गुंजवणी प्रकल्प शिवतारे यांच्या माध्यमातून केला आहे. कुल कुटुंब नेहमी बंड करण्यासाठी परिचित आहे. माझ्या उमेदवारीचे हे बंडच आहे. त्यात मी यशस्वी होणार आहे.’
‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,’ अशी शिफारसही आम्ही केंद्राकडे केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘पुरंदर’साठी आकर्षक पॅकेज
‘पुरंदरमधील नियोजित छत्रपती संभाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ‘समृद्धी’प्रमाणे शेतकरी-जमीन मालकांशी चर्चा करूनच पूर्ण करणार आहे. त्याचे आकर्षक पॅकेज आणि जमीन संपादनासाठी लागणारी तरतूदही केली आहे. हे विमानतळ म्हणजे पुरंदरच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरंदर विमानतळाबाबत भाष्य केले.
‘जेजुरीचा २५० कोटींचा आराखडा’
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीचा विकास करण्यासाठी सरकारने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार केला आहे. आचारसंहिता असल्याने बोलणे योग्य नाही. पण खंडेरायाचा आशीर्वाद आम्ही मिळवणार आहोत, तसेच ६५०० हेक्टर जमिनीवर जेजुरी ‘एमआयडीसी’चे विस्तारीकरण होऊ घातले आहे. त्यामुळे शेकडो आंतरराष्ट्रीय उद्योग येथे येत आहेत. त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांना होणार आहे. सासवड शहराची ५८ कोटी रुपये खर्चाची भुयारी भूमिगत गटार योजना दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना १५ वर्षांत मंजूर केली नाही. ती मी पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या रेट्यामुळे मंजूर केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

