लोक राष्ट्रवादी का सोडताहेत , पवारांनीच आत्मचिंतन करावे – देवेंद्र फडणवीस

Date:

पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
मुंबई- “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकांची राहण्याची इच्छा नाहीये, याचे आत्मचिंतन शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने करावे.” असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्यासोबतच “विरोधी पक्षाला आमचे आकर्षण आहे, त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत, पण त्यातील काही निवडक लोकांना आम्ही पक्षात घेऊ. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत. पण यात ज्या लोकांची ईडीची चौकशी सुरु आहे अशा लोकांना आम्ही पक्षात घेणार नाही. तसेच अशा लोकांची आम्हाला गरजही नाही अशी टीका त्यांनी केली.” असे मुख्यमंत्री म्हणाल
“निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारीला लागतात. त्यानुसार विविध पक्षातील नेते पक्षांतर करत असतात. पण काही नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यांना ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करत धमकावले जात आहे. तसेच त्यांच्यावर दडपण आणून राजकीय सत्तेचा गैरवापर केला जातोय अशी टीकाही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.”
तसेच, पक्ष सोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना धमकावले जात आहे. धमकी देण्यासाठी राज्य बँकेचाही वापर केला जात असल्याचेही खळबळजनक वक्तव्य पवारांनी केले. तसेच संस्था चालकांवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे सत्तेचा इतका टोकाचा गैरवापर होताना आतापर्यंत मी पाहिलेला नाही असेही टीका शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सशक्त भारत निर्मितीसाठी सर्वांचे योगदान महत्वपूर्ण-मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया

एमआयटी डब्ल्यूपीयूत ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा पुणे, दि. २७...

पीएमआरडीएकडून घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ;आता २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घर...

पुण्यात रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे – रामदास आठवले

बाळासाहेब जानराव यांच्यावर कोणतीही कारवाई नाही : रामदास आठवले पुणे...