महिला बचत व स्वयंसहाय्यता गटांना रास्त भाव दुकाने परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. ९ : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये रद्द केलेली व राजीनामा दिलेली रास्त भाव दुकान परवाने गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे कार्यक्षेत्रातील गटांना रास्त भाव दुकाने परवाने मंजूर करणेकामी इच्छुक महिला बचत गट व स्वयंसहाय्यता गटांनी संबंधित परिमंडळ अधिकारी यांचे कार्यालयात जाहिरात प्रसिध्द झालेचे दिनांकापासून १० सप्टेंबर, २०२१ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अन्न वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

विहित नमुन्यातील कोरे फॉर्म रक्कम रुपये ५/- इतके शुल्क संबंधित परिमंडळ कार्यालयात जमा केल्यानंतर दिले जाणार आहे. प्रत्येक रास्त भाव दुकान परवाना मिळणेसाठी अर्जदार यांनी स्वतंत्र फॉर्म भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्तीबाबत व इतर अनुषंगिक माहिती परिमंडळ कार्यालयात व अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर पाहावयास उपलब्ध असणार आहे.

रास्त भाव परवाना मंजुरीसाठी गटांची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये स्वयंसहायता गट अस्तित्वात असलेबाबत बँकेच्या खात्याचे पासबुक/ बचत गट स्थापन बाबतचे बँकेचे पत्र तसेच बचत गट नोंदणी प्रमाणपत्र,स्वयंसहायता गटाची आर्थिक व्यवहाराची माहिती दर्शविणारे प्रपत्र, बँकेचे पासबुक झेरॉक्स (साक्षांकीत केलेले), सभासदांना वाटप केलेले कर्ज व त्याची वसुली केलेबाबतचे बँकेकडील अधिकृत पत्र, स्वयंसहायता गटाकडे खेळते भांडवल असलेबाबतचा पुरावा म्हणून मागणी केलेले ३ वर्षाचे ताळेबंदपत्र व खेळत्या भांडवलाबाबत आवश्यक कागदपत्रे, स्वयंसहायता गटाने/सभासदाने बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्याची संबंधीत कागदपत्रे व सदर कर्जाची परतफेड नियमित करत असल्याबाबतचा पुरावा. स्वयंसहायता गट ज्या ठिकाणी परवाना चालविणार आहे. त्याबाबत जागेचा पुरावा म्हणून स्वतःची जागा असल्यास सिटी सव्र्हेचा उतारा तसेच भाडयाची जागा असल्यास मालकाचा सिटी, सर्व्हेचा उतारा व जागा मालकाचे रुपये १०० च्या स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्रामध्ये केलेले संमतीपत्र, इतर वैशिष्टयपुर्ण कामाबाबतचा अहवाल व त्याबाबतचा पुरावा. (राष्ट्रीय राज्यस्तरीत प्रादेशिक स्तरावरील प्रदर्शनामधील सहभाग व इतर शासकीय योजनेमधील सहभाग) या सहभागाबाबत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा, जिल्हा परिषद यांचे प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनेमधील सहभगाबाबत संबंधित जिल्हास्तरीय शासकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र, अर्जदार यांचेकडे मालकीची अथवा भाडे कराराची कमीत कमी २०० चौरस मीटर जागा असलेबाबतचा पुरावा, वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज मुदतीत संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जमा करावेत.

स्वयंसहायता गटाची निवड करताना महिला स्वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्य राहील. महिला स्वयंसहायता गट उपलब्ध न झालेस पुरुष स्वयंसहायता गटांचा विचार करण्यात येईल. जेथे स्वयंसहायता गट उपलब्ध होणार नाहीत अशा ठिकाणी शासनाचे ३ जानेवारी, २००७ च्या निर्णयात दिलेल्या सध्याचे प्राधान्यसूचीनुसार रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येतील. स्वयंसहायता गटांची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शकता व परतफेड चोख व नियमित असलेल्या स्वयंसहायता गटांना प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटांचे हिशोब व लेखे अद्ययावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान ८० टक्के असले पाहिजे.

 येईल. या निकषानुसार रास्त भाव दुकान परवाना मंजूरीसाठी बचत गटांची शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवड करण्यात येईल. तसेच संपूर्ण कागदपत्रांशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत. मुदतीनंतर व अपु-या कागदपत्रांसमवेत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरचा जाहिरनामा शासन परिपत्रक क्र.राभादु-२११७/प्र.क्र.१५७/नापु-३१, १ ऑगस्ट, २०१७ मध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.