पुणे– गाव आणि शहर ह्यांच्यात एक दृढ व्यवसायिक संबंध प्रस्थापित होऊन त्याद्वारे ग्रामीण भागात बनणार्या वस्तु शहरी भागात विक्रीसाठी उपलब्ध होणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी केले आहे. विमाननगर येथील व्हीक्फील्ड चेंबर मधील केंद्रीय खादी व ग्रामीण आयोगाच्या मार्फत सुरू झालेल्या “खादी इंडिया” नामक पहिल्या विक्री केंद्राचे (फ्रंचाइस स्टोअर) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ह्या वेळी आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, आमदार जगदीश मुळीक, आयोगाचे मुखी कार्य अधिकारी अनिल कुमार आदि उपस्थित होते.
“देशातील प्रत्येक जिल्हात अशा प्रकारचे विक्री केंद्र उघडून खादी ला सर्वदूर पोचविण्यासाठी आयोग कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या पुढाकारमुळे खादीचा प्रचार आणि प्रसार देशभर होत असल्याचे नमूद करून आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले ” २०१६-१७ मध्ये एकूण २००५ कोटी रुपयांची खादी विक्री झाली असून आगामी ५ वर्षामध्ये ५००० कोटींच्या विक्रीचे उदिष्ट असून त्याद्वारे एकूण २० लाख रोजगार निर्माण होणार आहेत”.