Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करण्याची अजित पवारांची मागणी:विनायक मेटेंचा घात की घातपात? उपस्थित केला प्रश्न ..

Date:

मुंबई-शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, अपघाताबाबत मेटेंच्या ड्रायव्हरची वक्तव्ये वारंवार बदलत आहेत. त्यामुळे मेटेंचा अपघात झाला की तो घातपात होता? अशी शंका निर्माण झाली आहे. सरकारने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अपघाताची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले. सर्वसामान्यांच्या मनात 1 टक्काही संशय राहणार नाही. अशा पद्धतीने तपास करण्यात येईल व कुणी दोषी आढळल्यास त्याला सरकार सोडणार नाही. दोषीवर तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

गुन्हा दाखल करणार का?

अजित पवार म्हणाले, विनायक मेटे यांच्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूप्रकरणी सभागृहात प्रश्न विचारण्याची वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. मेटेंच्या ड्रायव्हरकडूनही अपघाताबाबत वारंवार वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात अपघाताबाबत शंका निर्माण होत आहेत. नुकतेच माझे विनायक मेटे यांच्या पत्नीसोबत बोलणे झाले. त्यांनी अपघाताबाबत काही प्रश्न विचारले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास टाळाटाळ केली का? असे असेल तर याप्रकरणी काही गुन्हा दाखल झाले आहे का? अपघाताप्रकरणी जबाबदारी निश्चित करुन सरकार कारवाई करणार का?, असे प्रश्न विनायक मेटेंच्या पत्नीने विचारले असल्याचे पवार यांनी सांगितले.

कुणालाही सोडणार नाही

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रायव्हरचे स्टेटमेंट बदलत असल्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे खरे आहे. त्यामुळेच या अपघाताबाबत 1 टक्काही संशय राहू नये यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात जो दोषी आढळले त्याला सरकार सोडणार नाही. गुन्हेगारी स्वरुपाचा तपास सीबीआय करणार आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय तपासही करण्यात येणार आहे. कर्तव्यात कुणी कसूर केल्याचे आढळल्यास सरकार अशांना पाठीशी घालणार नाही.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करण्याची मागणी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सध्या 6 लेन असलेला हा मार्ग 8 लेन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वाधिक वर्दळ असलेला हा महामार्ग आहे. या महामार्गावर अवजड वाहनांची संख्याही सर्वाधिक आहे. मार्गावर अवजड वाहने बेदरकारपणे चालवली जातात. त्यामुळे इतर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच मार्गावरुन प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहंनांसाठी एक लेन असली तर ओव्हरटेक करताना अवजड वाहने लेन सोडतात. त्यामुळे अवजड वाहनांसाठी स्वतंत्र दोन लेन हवीत, अशी मागणी अजित पवारांनी केली.

रात्रीचा प्रवास टाळावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करणे आवश्यक असल्याचे सरकारचेही मत आहे. यासाठी महामार्गाच्या बाजूला जागा आहे का, याची चाचपणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. याशिवाय विनायक मेटेंसोबत जे झाले, ते इतर कुणासोबतही होऊ नये यासाठी शक्यतो रात्री 3 ते पहाटे 5 पर्यंतचा प्रवास टाळावा, असे आवाहनही फडणवीसांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...