पुणे- राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आज खा.वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुलींचे लग्न वय 18 वरून 21वर्ष करणे या संसदेत सादर केलेल्या बिलावर समाजातील सर्व स्तरावर चर्चा व्हावी यासाठी पत्रकार भवन येथे आयोजित केलेले चर्चासत्रसंपन्न झाले .राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम तसेच डॉ.जया सागडे (विधीतज्ञ) किरण मोघे (सामाजिक कार्यकर्त्या) डॉ. हेमलता जालगावकर (स्त्रीरोग तज्ञ) यांनी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेविका अश्विनी कदम, विजय बापू डाखले, मृनालीनी वाणी इत्यादी उपस्थित होते.
बाळ कोणाला म्हणावे ,बालविवाहाचे शारीरिक परिणाम आजपर्यंत कसे झालेले आढळतात .शहर आणि ग्रामीण,सधन आणि गरीब यांच्या मुलींच्या बाबतीत कोणती परिस्थिती आढळते ऍनिमिया ,कॅन्सर,महिला आणि गर्भाच्या मृत्यूची भयानक आकडेवारीस्त्री रोग तज्ञ डॉ.हेमलता जालगावकर यांनी समोर ठेवली.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या व्यासंगी किरण मोघे यानी सामाजिक बदल आणि मुलांच्या हातात आलेल्या माहितीच्या महाजालातून मिळणाऱ्या माहितीमुळे मुलांची बदललेली शारीरिक भावनिक गरज आपण लक्षात घेऊन समाज म्हणून पालक म्हणून बदलणार कि नाही असा महत्वाचा प्रश्न मांडला .शहर भागात प्रत्यक्ष जाऊन काम करा तरच सत्य उमगेल असे त्यानी उपस्थित कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले.
यानंतर विधीतज्ञ् डाॅ.जया सागडे यांनी या कायद्याच्या कलमांचा अर्थ काय हे सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल असे सांगितले . पहिल्या कलमात हा कायदा सर्व नागरिकांना लागू होतो ,सर्व जाती, धर्म, चालीरीतीत २१ वर्षे हे लग्नाचे वय. बालविवाह झाला तर २ वर्षांऐवजी ५ वर्षात वैद्यकारक करण्याची तरतूद . १४ अ कलम नव्याने तोच अर्थ सांगणारे आणखी एक कलम. प्रत्यक्षात विवाह,घटस्फोट,,पोटगी,दत्तक ,पालकत्व हे मूळ लक्ष देण्याचे कायदे आणि त्यात कोठे कसे बदल हवेत हे सांगूनही सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. एसी ऑफिसमध्ये बसून कायदे करणाऱ्यांनी आधी तळागाळात येऊन परिस्थिती समजून घेऊन कायदे करावेत अशी जोरदार टीका करीत आपले अतिशय अभ्यासू मत जया सांगडे यांनी मांडले.त्यांनी हि गोंधळाची परिस्थिती नेमकी पुढील पद्धतीने मांडली.. उदाहरणार्थ आजची मुलगी पालकांना विचारेल कि ,
‘मी मोठी का लहान ?मला कार चालवायचा परवाना वय १८ वर्षे पूर्ण म्हणून मिळाला ,मतदानाचा अधिकार मिळाला ,कायदेशीर कागदपत्रे करण्याची परवानगी मिळाली ,मी शारीरिक संबंध ठेऊ शकते पण लग्न करू शकत नाही कारण सरकारने लग्नाचे योग्य वय २१ ठरवले आहे. माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची घाई आहे कारण मी पळून जाऊन लग्न करेन,मला कायदेशीर कटकटी होतील मग मी काय करू सांगा.’ देशासाठी फार गंभीर असा कायदा मांडताना हि जागृती समाजात होण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेलने प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.
नितीन जाधव यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

