पुणे- भूमिपूजन झाल्यावर महापालिकेने वेळेत आणि योग्य काम केले पाहिजे असे स्पष्ट निर्देश देत :कोरोना जातो आहे,पण अजून गेलेला नाही , अशा अवस्थेत रस्त्यांवर सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी काळ्जी वाढविणारी आहे असे प्रतिपादन आज येथे राष्ट्रवादी चे खासदार , अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले . कोरोनाच्या काळात येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम आणि परिवाराने केलेल्या कामाचा गौरव करून त्यांनी आज .बिबवेवाडी तील सुखसागर नगर 1 येथे कात्रज कोंढवा रोड ते गंगा ओशन सोसायटी पर्यंत ४०० मिमी व्यासाची स्वतंत्र पाण्याची नलिका टाकणे ,तसेच महावीर नगर ते प्रेरणा हॉस्पिटल पर्यंत ३०० मिमी व्यासाची स्वतंत्र नलिका टाकणे, सुखसागर नगर भाग 2 करीता कात्रज कोंढवा रोड ते खंडोबा मंदिर पर्यंत ४०० मिमी पाण्याची एक्स्प्रेस नलिका टाकणे या सह विविध कामाचे भूमिपूजन केले .यावेळी नगरसेवक प्रकाश कदम यांनी ‘ कोणी कोणाचे कार्य आणि कला चोरू शकत नाही असे सांगत आपल्या विरोधकांना गर्भित इशारा दिला .
भूमिपूजन झाल्यावर महापालिकेने वेळेत आणि योग्य काम केले पाहिजे – खा. डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ)
Date:

