एनएटीच्या मदतीने रक्त तपासणीमुळे 70 महिन्यांच्या कालावधीत 111 जणांचे प्राण वाचले: जनकल्याण ब्लड बँक

Date:

पुणे: ऐच्छिक व वारंवार रक्तदान करण्यास उत्तेजन देण्यासाठी, तसेच  ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स (टीटीआय) यांचा प्रसार रोखण्यासठी रक्त तपासणीमध्ये सुरक्षित प्रक्रिया व तंत्रज्ञान यांचा वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.

रुग्णांना सुरक्षित रक्त उपलब्ध होण्याचे महत्त्व स्पष्ट होण्यासाठी, जनकल्याण ब्लड बँकेने शहरात गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. टीटीआयचा संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चामुळे आरोग्य यंत्रणेवर लक्षणीय ताण येतो, याबद्दल जागृती करण्याबाबतही परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. जनकल्याण ब्लड बँकेचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व  रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्स हेड डॉ. संदीप सेवलीकर यांनी मीडियाशी संवाद साधताना सुरक्षित ब्लड ट्रान्सफ्युजनवर चर्चा केली.

‘महाराष्ट्रातील रक्तविषयक सुरक्षितता व ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सचा प्रतिबंध’ यावरील अहवालाच्या मते, महाराष्ट्रातील डोनरमध्ये दिसून येणाऱ्या टीटीआयमध्ये एचबीव्ही व एचआयव्ही यांचे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा अधिक आहे. नाकोच्या नव्या अहवालानुसार, 2018-19 मध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 13% होते व 169 संसर्ग झाला.

सर्व सहभागींनी ऐच्छिक रक्तदान करण्याला उत्तेजन देण्याची गरज नमूद केली. यामुळे, टीटीआयचा धोका कमी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व ब्लड बँकांमध्ये एनएटी टेस्टिंगसारख्या आधुनिक रक्त तपासणी पद्धती अवलंबण्यावरही भर देण्यात आला. भारतात अंदाजे 2,500 ब्लड बँक आहेत व त्यातील केवळ 2-3% एनएटी टेस्टिंग करतात. देशातील व राज्यातील अनेक रुग्णालये/ब्लड बँक यांनी एनएटी तपासणी प्रक्रिया राबवलेली नाही.

ट्रान्सफ्युजनसाठी रक्ताचा तुटवडा असणाऱ्या भारतातील रुग्ण अशा संसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. चर्चेदरम्यान, एनएटीची शिफारस करण्यात आली, कारण त्यामुळे इन्फेक्टिंग ऑरगॅनिझमच्या जेनेटिक मटेरिअलचे (आरएनए व डीएनए) किंवा एचआयव्ही, हिपेटायटिस बी व हिपेटायटिस सी अशा विषाणूंचे थेट निदान केले जाते. डॉ. संदीप सेवलीकर यांच्या मते, “दान केलेल्या रक्तातील संसर्ग शोधण्यासाठी ही सर्वात संवेदनशील पद्धत आहे आणि ती सध्या जगभर उपलब्ध आहे. त्यामुळे विंडो पिरिएड – जेव्हा रुग्णाला संसर्ग होतो व जेव्हा चाचणी सकारात्मक निकाल दाखवते यादरम्यानचा कालावधी – कमी केला जातो. एनएटीसाठी विंडो पिरिएड कमी असल्याचे विचारात घेता, एनएटी-टेस्टेड रक्त मिळालेल्या रुग्णांमध्ये टीटीआयचे प्रमाण कमी होऊ शकते.”

डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले, “ब्लड ट्रान्सफ्युजन हा इमर्जन्सी मेडिकल केअरचा महत्त्वाचा घटक आहे. इमर्जन्सीच्या वेळी पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी सुनियोजित ब्लड ट्रान्सफ्युजन सेवेची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे डोनर यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्य होऊ शकते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असले तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते. जनकल्याणमध्ये आम्ही एनएटी टेस्टिंगमुळे 70 महिन्यांत 111 जणांचे आयुष्य टीटीआयपासून वाचवू शकलो, ही समाधानाची बाब आहे.”

डॉ. श्रवण सुब्रमण्यम यांनी सांगितले, “सुरक्षित व सहज उपलब्ध होईल असे रक्त व रक्तविषयक उत्पादने पुरवू शकतील अशा सुसंयोजित ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसचा (बीटीएस) प्रभावी क्लिनिकल वापर करणे सर्वप्रथम गरजेचे आहे. रॉशमध्ये आम्ही टीटीआयच्या संसर्गाच्या दृष्टीने, जगभर स्वीकारले जाणारे एनएटी टेस्टिंग भारतातील रुग्णांसाठीही उपलब्ध झाले पाहिजे, हे ओळखले आहे. जगभर 20% देशांनी एनएटी टेस्टिंग सक्तीचे केले आहे. सक्षम डायग्नॉस्टिक्समुळे आपल्याला सुरक्षित रक्तपुरवठा करून सुरक्षित केले जाते व यामुळे रुग्णांना त्यांच्या अन्य आजारांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.”

ब्लड ट्रान्सफ्युजन हा रुग्ण व्यवस्थापनातील महत्त्वाचा पैलू आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन ब्लड ट्रान्सफ्युजनमधील गुंतागुंतीमुळे एचआयव्ही, हिपेटायटिस बी (एचबीव्ही) व हिपेटायटिस सी (एचसीव्ही) अशा टीटीआयची लागण होऊ शकते.

जनकल्याण ब्लड बँक

जेकेआरपी ही आता ब्लड सर्व्हिससाठी नावाजली जात असून, ती नावाप्रमाणेच “लोकांच्या कल्याणा”साठी रक्त या महत्त्वाच्या विषयावर गेली 30 वर्षे कार्यरत आहे. ऐच्छिक रक्तदान चळवळीमध्ये ही ब्लड बँक जवळजवळ 30 वर्षे आघाडीवर आहे. पुणे विभागातील रुग्णांच्या सुरक्षित रक्तविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 1983 मध्ये जेकेआरपीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ब्लड बँकेने विश्वासार्ह व अवलंबण्यायोग्य ब्लड बँक म्हणून प्रतिष्ठा मिळवली. विविध क्षेत्रांतील व स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा सहभाग असणारे वश्वस्त पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ही ब्लड बँक चालवतात.

रॉश डायग्नॉस्टिक्स इंडिया

रॉश डायग्नॉस्टिक्स इंडिया प्रा. लि.ची स्थापना 2002 मध्ये झाली व कार्यालये चेन्नई, दिल्ली, कोलकाता व मुंबई येथे असून एकूण कर्मचारी 400 आहेत. आमच्या वैविध्यपूर्ण डायग्नॉस्टिक चाचण्या व व्यवस्था एकात्मिक आरोग्यसेवा सुविधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि लवकरच्या टप्प्यात निदान, टारगेटेड स्क्रीनिंग, आजाराचे मूल्यमापन व देखरेख यांचा समावेश करतात. रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे उद्दिष्ट “रुग्णांना नंतर ज्याची आवश्यकता भासेल ते आत्ताच करणे” हे आहे आणि त्यामुळेच देशाच्या भविष्यातील आरोग्यसेवा गरजांसाठी तयारी केली जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.