मुख्यसभा न चालविता ,लपवाछपवी आणि बनवाबनवीचा कारभार :आबा बागुल यांचा स्पष्ट आरोप

Date:

संसद,सिनेमागृह, शाळा सुरू पण पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मात्र नौटंकी ऑनलाईनवरच -मिलीभगत कोणा कोणाची ? आबा बागुल यांचा सवाल

पुणे- गेली वर्षभर कॉविड-19 कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाउनच्या काळात पुणे महानगरपालिकेचे अनेक निर्णय हे 67.3 क कलमांतर्गत मंजूर केले गेले.या कलमांतर्गत अनेक विषय चर्चा न करता, गुपचूप गुपचूप मंजूर करण्याची सोय आहे.मात्र ऑनलाईन पद्धत चालू ठेऊन कोणत्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता ऑनलाईन पद्धतीचा’ आंधळा खेळ पुणे महानगरपालिकेत अजूनही चालू आहे. या कालावधीत घेतलेल्या निर्णयांना मुख्यसभेची मान्यता घेणे आवश्यक असते. अश्यावेळी जे निर्णय घेतले,जे पैसे खर्च केले त्या संदर्भात मुख्यसभेत चर्चा होऊन ते मंजूर होणे अपेक्षित असताना आता मुख्यसभा देखील आंधळ्या ऑनलाईनवरच ठेवणार याचा अर्थ दाल में कुछ काला है… असा स्पष्ट आरोप पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी आज येथे केला आहे .

बागूल म्हणाले की, शहरात कोरोनाचा फैलाव कमी होताना दिसतो आहे. लस आल्याने आश्वासक वातावरण झाले आहे. लोकसभा चालू झालेली आहे.सर्व ठिकाणी काळजी घेऊन सिनेमागृह,शाळा सुरू आहेत.म्हणजे कोरोना काळात जे बंद होते ते आता हळू हळू सुरू होत आहे. मग पुणे महानगरपालिकेची प्रत्यक्ष सभागृहात मुख्यसभा घेणे ही काय विशेष चर्चेची बाब आहे. संसद सुरू आहे,सिनेमागृह,शाळांना परवानगी दिली आहे. तर मग पुणे महानगरपालिकेत ही अती… काळजी भाजप खरोखर मनापासून घेत आहे काय ? अगदी सभागृहात प्रचंड गर्दीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे मुख्य पदाधिकारी विनामास्क असल्याचे वारंवार दिसून आले आहे. मग मुख्य सभा न घेण्या मागे काय गौडबंगाल आहे कळत नाही. थेट सभागृहात सभा न घेता आत्तापर्यंत मंजूर केलेले विषयांवर चर्चा होऊ नये हाच त्यांचा डाव आहे.हे त्यातून स्पष्ट दिसून येत आहे. त्यांना असे काय लपवायचे आहे. की त्यांना असे वाटते की,त्यावर चर्चा होऊ नये.मुख्यसभा ऑनलाईन केल्यामुळे नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालयात बसून चर्चा करायची ही चर्चा झाली की,त्यांनी सर्व खर्च व कामे मंजूर झाली असे जाहीर करायचे. पण विरोधकांनी उठवलेला आवाज ,मागितलेली माहिती किंवा केलेल्या खर्चाचा हिशोब मागणे, चर्चा करणे हे जनतेसमोर कधीच येणार नाही. कारण मुख्यसभेत प्रत्येक्षात काहीच होणार नाही.अश्यावेळी बहुमताच्या आधारे मंजूर करून घेऊन जे काही त्यांनी केलेले आहे. ते झाकण्याचाच प्रयत्न यातून दिसून येत आहे.ही लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.आणि पुणेकरांचा हा हक्क आहे की, याकाळात आपण कोणते निर्णय घेतले,किती निधी खर्च केला, सुयोग्य निधी होता का? या सर्वांची चर्चा झाली तरच सर्व माहिती बाहेर येईल व पुणेकरांना कळेल त्या दृष्टीने सर्वसाधारण सभा ही सभागृहाताच व्हावी ऑनलाईन होऊ नये अशी मागणी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना करीत आहोत. आणि आयुक्तांनी त्याची खबरदारी घेणे त्यांचे कर्तव्य आहे.त्यात प्रशासनही सामील आहे का अशी शंका पुणेकरांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर बहुमताच्या आधारे रेटून प्रशासनाच्या मदतीने ऑनलाईनच सर्वसाधारण सभा घायचे भाजपने ठरवले तर पुणेकर त्यांना चौकाचौकात विचारतील की,त्यांना नक्की काय लपवायचे होते की,ऑनलाईन पद्धत चालू ठेवली आहे. त्यांचेच केंद्रातील सरकार संसद चालू ठेवतंय, सभागृह,नाट्यगृह, शाळा सर्व चालू ठेवतंय मग पुण्यातील भाजप सर्वसाधारण सभा घ्यायला का घाबरतंय? या प्रश्नाचे उत्तर पुण्यातील त्यांच्या नेत्यांनी किंवा महापौरांनी दिले पाहिजे व प्रशासनाने देखील याचे लेखी उत्तर द्यावे अशी मागणी आबा बागुलांनी केली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.