नवी दिल्ली-देशात कोरोना विरोधात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा आज 100 वा दिवस आहे. 16 जानेवारीपासून 24 एप्रिल म्हणजेच 99 दिवसांमध्ये 14 कोटी 8 लाख 2 हजार पेक्षा जास्त म्हणजेच 10% लोकसंख्येला लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 11 कोटी 85 लाख लोक असे आहेत, ज्यांना एक डोस देण्यात आला आहे. 2 कोटी 22 लाख लोकांना अद्याप डोस मिळालेले नाहीत. एक्सपर्ट्सनुसार, कोरोनाची तिसरी आणि अजून कोणतीही लाट येऊ नये यासाठी देशाच्या 70% लोकसंख्येला लस घेणे खूप गरजेचे आहे.
आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंट लाइन वर्कर्स, 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोकांना आणि इतर गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या लोकांना मोफत लस दिली जात होती. एक मेपासून केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनाही लस देण्याची मंजूरी दिली आहे.
खरेतर, यावेळी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, हे 18 से 45 वर्षांच्या आतील लोक किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सीन घ्या किंवा मग राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या व्यवस्थेनुसार लसीकरण करा. म्हणजेच या वयाच्या लोकांना केंद्र सरकारकडून फ्री व्हॅक्सीन दिली जाणार नाही. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पहिल्या प्रमाणे मोफत लस देणे सुरुच राहिल. अशा वेळी 11 राज्यांनी प्रत्येक वयाच्या लोकांना मोफतमध्ये लस देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, केरळ, आसाम, झारखंड गोवा सिक्किमचा समावेश आहे.

