१३ व्या पुणे इंटरनँशनल चित्रपट महोत्सवात श्री सिद्ध इमेजीनेशनच्या ‘आभास’ या चित्रपटाचा शो १३ जानेवारी रोजी १.वा. मंगला चित्रपटगृहात दाखवण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या वेळी संपूर्ण चित्रपट टीमने आवर्जून हजेरी लावली होती. मराठीत सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांना नवनवीन चित्रपट, निर्माते व दिग्दर्शक चांगल्याच पद्धतीने हाताळताना आपणाला दिसत आहेत. ‘आभास’ हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नसून तो पिफ मध्ये मराठी टुडे या विभागात निवडला गेला आहे. प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादाने चित्रपटाची टीम भलतीच खूष झालेली दिसली.
‘आभास’ हा चित्रपट अर्थातच सस्पेन्स थ्रिलर असून तो भयपट व भीती दाखवायला तो कुठे ही कमी पडत नाही. या चित्रपटात कलाकारांचा अभिनय, कथा – पटकथा – संवाद व चित्रपटाचे पार्श्व संगीत दर्जेदार असल्याने चित्रपट उत्तम ठरतो. चित्रपटाचे कथासार हे सस्पेन्स थ्रिलर असून एका गावात घडत जाणाऱ्या घटना त्या घटनांचा माघोवा घेण्यासाठी शहरातून गावाकडे येणारा लेखक, गावाबाहेर त्याचा रात्री होणारा अपघात व त्यातून घडणाऱ्या विविध घटना व त्याला रात्री अनुभवास आलेले भास व आभास यावरच या चित्रपटची कथा बेतली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक गजानन कुलकर्णी म्हणाले’, वेगळया धाटनीचा सिनेमा करायचा असे माझ्या डोक्यात होते म्हणून मी ‘आभास’ हा चित्रपट केला. ‘आभास’ हा चित्रपट प्रेक्षकांनी एन्जोय करावा यातील थराराचा अनुभव घ्यावा. चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली असून चित्रपटातील प्रत्येक सीनवरती खूप काम केले असून उच्च दर्जाचा चित्रपट केला आहे. माझा आगामी चित्रपट हा म्युझिकल लव्ह स्टोरीवरती असणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्या दिपाली जी म्हणाल्या, कि एक चांगली कलाकृतीची मी निर्मिती केल्याचे मला समाधान आहे. या चित्रपटाकडून मला खूप अपेक्षा आहेत. रसिकांनी या कलाकृती आवर्जून पहावी. हा चित्रपट करताना कोणती हि तडजोड केली नाही. उत्तम चित्रपट बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट लवकरच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे.
या चित्रपटात अंकुश चौधरी, सुहास पळशीकर, मिलिंद शिंदे, जान्हवी देशपांडे, दीपाली जी, गजानन कुलकर्णी, अनिकेत देशमुख, अभय कुलकर्णी, दीनबंधु शेळके, राजेंद्र जाधव हे कलाकार असून निर्मात्या दीपाली जी, दिग्दर्शक, गजानन कुलकर्णी, छायाचित्रण, चंद्रशेखर अय्यर, कथा – पटकथा – संवाद, गजानन कुलकर्णी, सहाय्यक दिग्दर्शक अमुल्य, डॉ हर्षवर्धन श्रोत्री, अनिकेत अळंधीकर, कला दिग्दर्शक, देवदत्त राऊत, नंदू मोहरकर, संगीत दिग्दर्शक – शेख कासीम, गीत, सुमित काहात तर संकलन व ध्वनी मुद्रण संतोष जीवनजीकर यांचे असून चित्रपटाचे ध्वनी मुद्रण हे सुरेख असल्याने चित्रपटाचा थरार अनुभवण्यास मिळतो. त्याच बरोबर चित्रपटाचे संकलन चांगल्या रीतीने केले असल्याने चित्रपटला चांगलीच गती मिळते.