Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

युतीच्या भवितव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी घेणार निर्णय

Date:

Uddhav1विsonia_sharad_pawar_20090928(1)
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला सतत अल्टिमेटम दिल्यानंतरही काँग्रेसने हा विषय रेंगाळत कसा राहील याचीच दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
 भाजप व शिवसेना युतीचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीने टोलवाटोलवी करण्याचा यशस्वी प्रयत्न चालवलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकमेंकांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्यात सुसंवाद असल्याचे नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्याचा फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत अशीच टोलवाटोलवी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज चार वाजता मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यात पक्षाच्या विविध नेत्यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे यासाठी पक्षनेतृत्त्वाला साकडे घातले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रफुल्ल पटेलांनी आपण काँग्रेस नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचे इतर नेत्यांना यावेळी सांगितले. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र राहावे, ही आम्हा नेत्यांची प्रामाणिक भावना आहे. पंधरा वर्षापासून आपण एकत्र आहोत. जातीयवादी पक्षांचे मोठे आव्हान असताना या निवडणुकीलाही एकत्रपणेच सामोरे जावे, अशीच भूमिका राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. मात्र, जागावाटपाचा प्रश्न सोडवताना काँग्रेसने सन्मानजनक, सामंजस्यपूर्ण आणि अनुकूल असा प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पटेल यांनी सांगितले की, आमच्या नेत्यांची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतली. दिवस मोजकेच राहिल्याने काँग्रेसने जागावाटपाबाबत व्यावहारिक तोडगा काढवा, अशी बहुतेक नेत्यांनी आशा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल यांच्या संपर्कात आहे. त्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी व तोडगा काढावा अशी भूमिका मांडली आहे. आमच्याही नेत्यांचे तेच मत आहे.
याचबरोबर शिवसेना-भाजप महायुतीवर आघाडीतील दोन्ही घटकपक्ष बारीक लक्ष ठेवून आहेत. ही युती फिसकटली तर राज्यात नवीनच राजकीय स्थिती तयार होईल. अशा स्थितीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला आपण सर्वाधिक जागा जिंकू शकतो असा विश्वास वाटतो. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्व ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच ज्या ठिकाणी विरोधक प्रबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती करून एकमेंकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरविले आहे. जेणेकरून आघाडीला चौथ्यांदा सत्ता हस्तगत कशी करता येईल हे पाहायचे हे धोरण ठरल्याने महायुतीचा फैसला झाल्याशिवाय आघाडीच्या जागावाटपाला वेग येणार नाही. तसेच अंतिम निर्णयही होणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्त्वात जागावाटपात जवळपास समझोता झालेला आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 ते 130 जागा देऊ केल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी किमान 134 ते 136 जागांची मागणी करीत आहे. विरोधी पक्षांची महायुती झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला 130 च्या आसपास जागा सोडू शकते. मात्र, युतीचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घ्यायचा नाही हे दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक आयोगाच्या’ चुकांची जबाबदारी फडणवीस टाळतात कशी..?

‘निवडणूक आयोगाची निर्मिती’च् सरन्यायाधीशांना बाजूला करून भाजप’ने मनमानीपणे केली…!—...

राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊतांच्या घरी

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (ठाकरे गट)...

दिव्यांगांच्या पद सुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना-तुकाराम मुंढे

• प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित मुंबई, दि. ०३ : दिव्यांग...