विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 3 ऑक्टोबरला पोटनिवडणूक

Date:

मुंबई-राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 14 सप्टेंबरला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. 22 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून,24 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर 26 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून,बुधवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून, त्याच दिवशी 5 वाजता मतमोजणी करण्यात येईल.फुंडकर यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 2020 पर्यंत होता. विधानसभेत भाजपचे सदस्य सर्वात जास्त असल्यामुळे इतर कोणताही पक्ष या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. पर्यायाने भाजपमध्ये आता तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. फुंडकर ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यामुळे विदर्भातील ग्रामीण भागातूनच उमेदवार द्यावा, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील कार्यकर्त्याला संधी द्यावी, असाही विचार पुढे येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, दि. १२ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या...

भाजपा दुसऱ्यांचे पक्ष गिळणारी चेटकीण.

..राज्यात आंधळं बहिरं व मुकं सरकार..खरिप हंगामासाठी महायुती सरकारची...

आता कंबोडियामध्येही भारतीय पर्यटकांना यूपीआय (UPI) पेमेंटची सोय

मुंबई: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या NPCI इंटरनॅशनल...

पुण्यातील एयूएम तीन वर्षांत दुप्पट; महाराष्ट्राच्या म्युच्युअल फंड वाढीच्या प्रवासात पुणे ठरले महत्त्वाचे केंद्र:ए. बालसुब्रमण्यन

पुणे- आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन पुणे दौऱ्यादरम्यान म्‍हणाले की, पुणे देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत या शहरातील एकूण एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) दुप्पट झाले आहे. बालसुब्रमण्यन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक क्षेत्रात पुण्याची वाढती भूमिका आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग निदर्शनास आणले. पुण्यात नेहमी एक मजबूत इक्विटी संस्कृती राहिली आहे, जिथे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक, संपत्ती निर्मिती आणि चक्रवाढ व्याजाची ताकद या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. "ऐतिहासिकदृष्ट्या पुणे नेहमी उच्च वाढ देणारी बाजारपेठ राहिली आहे. याउलट, मी म्हणेन की, पुण्यातील इक्विटी संस्कृती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहे, कारण येथील व्‍यक्तींना दीर्घकालीन बचतीचे महत्त्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद चांगली समजते. पुणे सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ राहिली आहे आणि माझ्या मते, भविष्यातही अशीच वेगाने वाढणारी बाजारपेठ राहील," असे बालसुब्रमण्यन म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडसाठी महाराष्ट्र नेहमी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा (आरओएमजी) मधील म्युच्युअल फंडाची मालमत्ता आज जवळपास ५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी सध्या देशभरात अंदाजे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील जवळपास १.२ कोटी ग्राहकांच्या पोर्टफोलिओला सेवा प्रदान करत आहे. बालसुब्रमण्यन यांच्या मते, हा विकासाचा प्रवास आता राज्यातील केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे वेगाने विस्तारत आहे. वाढती आर्थिक घोडदौड, पायाभूत सुविधांचा विकास, एसएमईचा वाढता विस्तार आणि कौटुंबिक उत्पन्नातील वाढ यामुळे इतर उदयोन्मुख केंद्रांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत मत व्‍यक्त करत या म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्‍हणाले की, म्युच्युअल फंड व एसआयपीबद्दल वाढणारी जागरूकता पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. भारत आता जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ते म्‍हणाले की, योग्य आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण सहभाग हाच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मुख्य आधार ठरेल.