दुष्काळ जाहीर करण्यास चंद्रकांत पाटील मुहूर्ताची वाट का बघताय ? : अजित पवार

Date:

पुणे-यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. मात्र, भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू असे सांगतात. दुष्काळ जाहीर करण्यासाठी चंद्रकांत पाटील हे मुहूर्ताची वाट का बघतायेत, अशा शब्दांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले की,देशातील अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला असताना, हे सरकार एवढा वेळ का लावत आहे ? यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे. यंदा भूजल पातळी खाली गेली असून त्यामुळे जलयुक्त शिवाराची कामे कशाप्रकारे झाली असतील हे कळतं. जलयुक्त शिवाराबाबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारी शिवसेना भाजपावर टीका करतेय. सत्तेमध्ये असून भाजपावर टीका करणे योग्य नाही, भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष राज्यातील परिस्थितीला जबाबदार आहेत. अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली.

ते पुढे म्हणाले की,शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव मिळाला पाहिजे,दूधाला चांगला भाव मिळाला पाहिजे या मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यसरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

मुंबई, दि. ०६ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे...

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,: राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने...

घरखरेदीदारांसाठी जगातील पहिले एआय प्रॉपर्टी सर्च इंजिन ‘CREDAIBILITY.AI’ चे लॉन्च

पुणे, ६ मार्च २०२६ : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी...

सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कर

पुणे, दि. ६: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेल्या...