मुंबई / करमाळा. (शाहरुख मुलाणी) – गोरगरिबांची सेवा, मदत करणे हाच आमचा धर्म असल्याचे मत टायगर ग्रुप महाराष्ट्र चे संस्थापक जालिंदर जाधव तर युवा वर्गाला घडवणे हा आमचा उद्देश आहे असे मत अध्यक्ष तानाजी जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.
यावेळी जालिंदर जाधव म्हणाले की, आम्ही गरिबी बघितली असून अनुभवली आहे. आमच्यावर जर अडीअडचणी येऊ शकतात तर सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल हा विचार करून आम्ही ही संघटना चालवत आहोत. कोणालाच अडीअडचणी येऊ नये. गोरगरिबांच्या अडीअडचणी मध्ये आपला हातभार लागला पाहिजे. पैश्यांपुढे कोणाचेच नाही लागत नाही हे आपण सर्वजण जाणतो. एखादा व्यक्ती एखाद्या पर गावी गेला तर त्यास होणाऱ्या अडचणीस समोर येऊन कोणी मदत करत नाही अशा वेळी त्यास तात्काळ मदत व्हावी मग ती कसलीही अडचण असू द्या यासाठीच आम्ही टायगर ग्रुप आम्ही तयार केला आहे. रुग्णालयात गोरगरिब रुग्णांना मदत करून त्याच्या उपचारासाठी मदत व्हावी. सामान्य माणसाला जी गरज भासते, लागते. त्यास मदत करत राहणे. सोशल मिडियाद्वारे आमच्या संघटनेत फक्त गेल्या 10 – 12 दिवसात 45000 युवक – युवतींनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केली असून आमचे ध्येय 10 लाख पर्यंत पोहचणे हा आहे. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की, आपला मुलगा निरव्यसनी असला पाहिजे. हा हेतू आम्ही अंगी गाठला आहे. आम्ही आमच्या सदस्यांना कोणतेही व्यसन करू देत नाही. महाराष्ट्रातील गावागावात पर्यंत आमचे 40 हजार व्हाट्स अँप ग्रुप असून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे. कपडे वाटप, जेवण वाटप, खाऊ वाटप असे उपक्रम रोजच सुरू आहे. काही मुले रागीट असतात पण त्यांच्या मनात दयेची भावना असते. http://tigergroupindia.org/ या वेबसाईट वरून आमचे सदस्य होता येते. तर आम्ही महाराष्ट्रातील तरुण तरुणींना आव्हान करतो की, जास्तीत जास्त लोकांनी सदस्य व्हावे. असे टायगर ग्रुप महाराष्ट्र चे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले आहे.