मुंबई – राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.
ही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.
आज महाराष्ट्रातील हजारो वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे राज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.
सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेक।वरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.
चालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हे।मानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील वयोवृद्ध कलावंतांना सध्या “अ-ब-क” या वर्गवारी नुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५००रुपये दरमहा मानधन मिळते,परंतु या अधिवेशनात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री यांच्या एक प्रश्नाला उत्तर देताना लवकरच या मानधनात वाढ करण्यात येईल,असे आश्वासन विधानसभेत दिले.
महाराष्ट्रातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याची योजना सन १९५४-५५ या वर्षांपासून राबविण्यात आली आहे. दि. आँगस्ट २०१४ रोजी दिड पटीने मानधनात वाढ करण्यात आली आहे.सन २०१६१७ पासून इबीटी प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना थेट त्यांच्या खात्यात मानधन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परंतु चार -पाच महिने जर मानधन मिळत नसेल तर याचा उपयोग काय..! असे मानधनाचा लाभ घेणाऱ्या कलावंताचे म्हणणे आहे.
सध्या राज्यात लोककलावंताना संघटीत करण्याच्या नावाखाली शेकडो संघटना रजिस्टर झाल्या आहेत.पण फक्त वर्गणी घेवून पैसे गोळा करण्याचा धंदा काही लोककलावंताच्या संघटनांच्या नेत्यांनी सुरू केले आहे.कधी लोककलावंताच्या प्रश्नावर निदर्शन नाही..कधी रस्त्यावर उतरून आंदोलनं नाही.त्यामुळे सांस्कृतिक कार्य खातं केवळ आणि केवळ लोककलावंतावर अन्याय करीत असल्याचे एक तमाशा फड मालकाने स्पष्ट केले.