पुणे-जिल्हाधिकारी, आणि पोलीस आयुक्तालय अगदी हाकेच्या अंतरावर , सीआयडी , विधान भवन अशी नामांकीत कार्यालये जवळ जवळ असताना … येथील सहकार भवन मध्ये होणारी राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची अवघ्या २१ संचालकांमध्ये होणारी निवडणूक चक्क कायदा सुव्यवस्थेचे कारण देत आज स्थगित कार्यात आली . सहकार संघाचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी हि निवडणूक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे . बहुमत भाजपकडे नव्हते म्हणून 2 आमदारांसह काहींनी या ठिकाणी धुमाकूळ घालवून हि निवडणूक पराक्रीया उधळवून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे .अजय देवगण याच्या गंगाजल चित्रपटात ठेका सुंदर यादव ला मिळविण्यासाठी फार मोठी हाणामारी करावी लागते असे कथानक आहे . पण येथे केवळ खुर्च्या उचलून फेकल्या , टेबल आडवे तिडवे केले कि दहशत पसरते आणि अधिकारी ,पोलीस गाशा गुंडाळतात कि काय ? असा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती झाल्याचे समजते आहे .
(दरम्यान निवडणूक प्रक्रिया दरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने निवडणुकीस गालबोट लागले आहे. या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले यांनी रिव्हॉल्व्हर दाखवण्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि या संस्थेच्या विद्यमान संचालिका विद्या पाटील, तसेच विद्यमान संचालिका सुनीता माळी यांनी आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला, असा आरोप पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्याठिकाणी खुर्च्या आणि टेबल तोडण्यात आले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि संजीव कुसाळकर यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक झाली होती. दरेकर हे या संस्थेच्या मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनेलने आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला. )
तर राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज (सोमवारी) निवडणूक होती. मात्र, निवडणूक सुरु झाल्यावर आमदार दरेकर, लाड तसेच नलावडे यांनी मतपेट्या फेकत खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. बहुमत नसल्याने निवडणूक हरल्याच्या भीतीने निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आज कॉंग्रेस भवन मध्ये आलेल्या 11 सदस्यांनी केला.आमच्याकडे 11 सदस्य होते तर आमदारांच्या कडे १० सदस्य होते. आता निवडणूक उधळून लावून आमच्या वर दबाव आणून आमचे संख्याबळ कमी करण्यासाठी हे डावपेच करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलिसांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष मोडतोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर निवडणूक अधिकारी यांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत हि निवडणूक स्थगित करून पोबारा केला . असे हि त्यांनी सांगितले …पहा कॉंग्रेस भवनात येवून या 11 जणांनी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय सांगितले …