कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्याने आजारांवर मात : डॉ. जगन्नाथ दीक्षित
पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बर्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त तीन महिन्यात होतो, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पुणेेकरांना दिला.
अग्रवाल सोशल नेटवर्क पुणेच्या वतीने शुक्रवारी गणेश कला क्रिडा केंद्र, स्वारगेट येथे आयोजित डॉ. जगन्नाथ दिक्षित हेल्थ मंत्र या कार्यक्रमात विना सयास वजन कमी करणे(वेट लॉस) व मधुमेह प्रतिबंध विषयावर डॉ. दीक्षित बोलत होते. यावेळी मंचावर अग्रवाल सोशल नेटवर्कचे फाऊंडर राहुल राम अग्रवाल, आमदार माधुरीताई मिसाळ, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय दत्तूराम मित्तल, ममता अग्रवाल उपस्थित होथे. अग्रवाल सोशल नेटवर्कच्या वतीने हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो नागरिक याचा लाभ घेतला.
दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतलं पाहिजे आणि कमी जेवण्यापेक्षा कमी वेळा जेवणं गरजेचं आहे असंही डॉ. दीक्षित म्हणाले. दोनवेळा जेवतानाही ते जास्तीत जास्त 55 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. हा डाएटप्लॅन फॉलो केल्यास वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, रक्तातील तीन महिन्यातील कळणारं साखरेचं प्रमाण कमी होईल आणि फास्टिंग शुगरही कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकदा जेवतो तो योगी, दोनवेळा जेवतो तो भोगी आणि तीनवेळा जेवतो तो रोगी अशी संतांची शिकवण आहे, याचाही दाखला त्यांनी दिला. आहारात हे बदल केल्यामुळे वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आपण समोर पदार्थ दिसला की खातो. भूक लागलेली नसतानाही खाल्ल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने या अनेक आजारांना आळा बसण्यास मदत होते असंही त्यांनी म्हटलं आहे.आहारामध्ये साखर, मध, गूळ यांचं प्रमाण जेवढं कमी ठेवाल तितकाच आरोग्याला फायदा होईल. शाकाहारी लोकांनी आहारात प्रथिनं म्हणजेच प्रोटिन्सचा आहारात जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. त्याचाही शरीराला मोठा फायदा असल्याचं डॉ. दीक्षितांनी कट्ट्यावर सांगितलं. यात मोड आलेली कडधान्य, डाळ, सोयाबीन, शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला प्रथिनांचा मुबलक पुरवठा होतो. दरम्यान दोन जेवणांमध्ये पाणी, घरात बनवलेलं ताक, आवडत असल्यास ग्रीन टी किंवा ब्लॅक टी, 25 टक्के दूध 75 टक्के पाण्यात घालून त्याचा पातळ चहा, नारळपाणी, तसंच एखादा टोमॅटोही खाता येईल, ज्याने शरीराला फायदा होईल.
अग्रवाल सोशल नेटवर्कचे फाऊंडर राहुल राम अग्रवाल म्हणाले, अग्रवाल सोशल नेटवर्कच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजिक भावना ठेवून आणि दिवसें दिवस वाढते आजार वजन यासाठी योग्य मार्गदर्शन लोकांना मिळावे म्हणूनच डॉ. जगन्नाथ दिक्षित हेल्थ मंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या हेल्थ मंत्राचा लाभ सर्व पुणेकरांना व्हावा हा उद्देश होता त्यास पुणेकरांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रवाल सोशल नेटवर्कचे सर्व पदाधिकारी आणि अन्य 19 संघटनाचे सहकार्य लाभले