पुणे – राज्याच्या विविध भागांत दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत असून पश्चिम महाराष्ट्र, नाशिक परिसरात अनेक धरणे ओसंडली आहेत.खडकवासला धरणातून सध्या अकरा वाजल्यापासून 35574 cusecs इतका विसर्ग चालू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली असल्यामुळे त्या दोन्ही धरणातून अनुक्रमे 12936 व 9035 असा विसर्ग चालू असून पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला असल्यामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून एकूण 41756 cusecs इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.चासकमान धरण परिसरात व भिमाशकर भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात ३०० मीमी पावसाची नोंद झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात आहे.चासकमान धरणातून दि.४.८.१९ आज सकाळी १०.३० वा. २६४७५ क्युसेक्स वरून ४५६३० क्युसेक्स विसर्ग वाढवणेत आला आहे येरवडा येथील शांती नगर ,भारत नगर ,इंदिरा नगर येथील अनुक्रमे २५० /७५/२०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे संजय मोरे यांनी दिली .कळस,विश्रांतवाडी ,येरवडा येथील महापालिका शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. किनारी प्रदेशात सोसाट्याचे वारे वाहतील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
खडकवासला, पानशेत धरण १०० टक्के भरल्याने पानशेतमधून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आज (रविवारी) सकाळी ११ वाजता ३५ हजार ५७४ क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण होणार असून नदीलगतच्या अनेक भागात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणातून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे आताच नदीपात्र ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस पडला असून रविवारी सकाळपासून पाऊस चालू असल्याने पानशेत व खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने प्रशासनाने पुणेकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने औंध, दापोडी, बोपोडी, येरवडा, हडपसर, शिवणे, उत्तमनागर, खिलरेवस्ती, सिंहगड रोड, शिवाजीनगर, जुना बाजार, ढोले-पाटील रोड आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, नाशिक व नगर जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील धरणे भरू लागली असून या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उद्यापर्यंत पाण्याचा वेग वाढवण्यात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
. ८३,७७३ क्युसेक वेगाने नांदुर मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी नदीमध्ये विसर्ग { गंगापूर धरणातून सकाळी नऊपासून १७७४८ क्युसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात अाल्याने गाेदावरीने नाशकात शनिवारी धाेक्याच्या पातळी गाठली. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने
नगर : भंडारदराून प्रथमच प्रवरामध्ये साडेचार हजार क्युसेक वेगाने विसर्ग. हे पाणी कायगाव टोका येथे गोदावरी-प्रवरा संगमात दाखल होईल.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो. सर्वच्या सर्व ३८ दरवाजे उघडले.
प.महाराष्ट्रात धरणे तुडुंब
पानशेत : धरण काठोकाठ भरल्याने आंबी नदीत विसर्ग सुरू.
कोयना : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस सुरू असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून सुमारे २० हजार क्यूसेकने विसर्ग.
खडकवासला,पानशेत पूर्ण भरले, वरसगाव, टेमघर : ही धरणेही भरण्याच्या वाटेवर. भामा आसखेडमधून आठ हजार क्यूसेकने भीमा नदीत पाणी सोडले.
वसईत मुसळधार पाऊस, पुरात १४ वर्षाचा मुलगा वाहून गेला. मोरी गावातील दुर्दैवी घटना.
डिंभे : धरण पूर्ण भरल्याने ५ हजार क्यूसेक विसर्ग चालू.
कसारा घाटात दरड कोसळली, नाशिक-मुंबई महामार्ग बंद.
पुणे-माणगाव हायवेवर माले या गावाजवळ पुलावर पाणी आल्यामुळे प्रवासाकरिता व पर्यटकांकरिता हायवे पौड बंद
पुणेः घोटावडे – अंबडवेट दरम्यानच्या पूल परिसरात मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली.
पुणेः बाणेरची स्मशानभूमी पाण्याखाली, ज्युपिटर हॉस्पिटल, प्रथमेश पार्क, डीएसके गंधकोष सोसायटीत पाणी
-बोरघाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेमार्ग बंद
-गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने मुंबई, ठाण्यातील लोकांना केले आहे.
जायकवाडीतील पाणीसाठा ११.५९%
पैठण – जायकवाडी धरणाच्या वरील भागात असलेल्या धरणांतून विसर्ग सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीच्या माेजणीनुसार जायकवाडीतील पाणीसाठा ११.५९ टक्क्यांवर आला. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक सुरूच राहणार असल्याने जायकवाडीतील पाणीपातळी रविवार संध्याकाळपर्यंत चांगली वाढू शकेल.
गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद – नाशिक जिल्ह्यातील धरण प्रकल्प क्षेत्रात सतत पाऊस चालू आहे. येत्या ३-४ दिवसांत आणखी पावसाची शक्यता पाहता जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. गोदावरी नदीलगत पूरस्थिती असल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. नदीपात्रात प्रवेश करू नये, जनावरांना मोकळे सोडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.
मुंबई : पांडवकडा धबधब्यात ४ मुली बुडाल्या, ३ मृतदेह सापडले
मुंबई – नवी मुंबईतील खारघरजवळील पांडवकडा धबधब्यात एका कॉलेजमधील चार विद्यार्थिनी वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली. पैकी तीन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. चारही विद्यार्थिनी सहलीसाठी पांडवकडा धबधब्यावर आल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात प्रवाहात वाहून गेल्या. सकाळी ११ वाजता ही घटना घडली. मृतांत चेंबूर येथील नेहा जैन (१९) हिचा समावेश आहे.