पुणे-
येणारी २३ तारीख ही आपल्या विजयाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची तारीख आहे. मतमोजणी प्रतिनिधींनी
ईव्हिएम मशीनबाबत जागृत राहून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उपस्थित राहावे. विजय शंभर टक्के
आपलाच आहे. असा विश्वास पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार
मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या
मतमोजणीच्या निमित्ताने मतमोजणी प्रक्रिया आणि ईव्हिएम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे निरीक्षक राहुल साळवे यांनी मतमोजणी
कशी करायची व मतमोजणी प्रक्रियेसाठी काय कारायचे याबाबत सादरीकरण केले. उपस्थित मतमोजणी
प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी यावेळी अनेक तांत्रिक मुद्दे आणि एखादा शंका घेण्यासारखा प्रसंग उपस्थित झाला
तर त्यावेळी नेमके काय करायचे याबाबत प्रश्न विचारले. साळवे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांना
मार्गदर्शन केले. अॅड. अभय छाजेड, माजी महापौर दत्तात्राय गायकवाड, नितीन कदम, गोपाल तिवारी,
नगरसेवक दत्ता बहिरट, मनीष आनंद, वीरेंद्र किराड, अॅड. रुपाली पाटील, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा
सोनाली मारणे, शशिकला कुंभार, शशिकांत तापकीर, सागर अल्हात जयंत किराड, अनिल सोंडकर, रवींद्र
भुतडा, सचिन आडेकर, प्रवीण करपे, बाळासाहेब अमराळे, दत्ता सागरे, शिवाजी बांगर, दीपक जगताप, विजय
खराडे, गणेश नलावडे, शैलेश नलावडे, यासिर बागवे, आदी यावेळी उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेसच्या आणि सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक
जिंकण्यासाठी कष्ट करून मतदान करून घेतले. त्यामुळे २३ मे ही तारीख विजयाच्या दृष्टीने महत्वाची आहे.
मतमोजणी प्रतिनिधींनी वेळेवर मतमोजणी केंद्रावर आपापल्या जागेवर उपस्थित राहावे. ही निवडणूक
संघर्षाची आहे. शेवटच्या फेरीपर्यंत विजय जाणार आहे आणि शंभर टक्के विजय आपलाच आहे. त्यामुळे शेवटची
फेरी संपेपर्यंत जागा सोडू नये असे आवाहन त्यांनी केले.
दीपक जगताप यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सहाही मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित दरेकर यांनी केले तर सूत्रसंचालन गौरव बोराडे यांनी केले. वीरेंद्र किराड यांनी
उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार असणार आहे. त्यामुळे
मतमोजणीसाठी सकाळी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करत सर्वांचे आभार मानले.