पाठांतर चिंतन-मनन आणि मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व द्या – डॉ.गजानन एकबोटे
पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल येथे दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव, संस्थेचे कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, संस्थेच्या सहकार्यवाह,नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे,समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे,नियामक मंडळ सदस्य डॉ.नंदकिशोर एकबोटे, उपकार्यवाह डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष व उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, शाळेचे व्हिजिटर उद्धव खरे, नियामक मंडळ सदस्य मृगजा कुलकर्णी,मुख्याध्यापिका सांगिता लकारे,उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे,पर्यवेक्षिका सीमा कुळधरण,माजी पर्यवेक्षक पी.के.जोशी उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व संस्कृत गीत सादर करून केले. मुख्याध्यापिका संगीता लकारे यांनी प्रस्ताविक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शुभांगी घेवडे यांनी करून दिला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विघ्नहरी महाराज देव म्हणाले,संस्कृत मंत्राच्या उच्चरणामुळे स्मरणशक्ती वाढते,बुद्धी तल्लख होते.वाणी शुद्ध व स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेची आवड निर्माण केली पाहिजे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले,संस्कृत ही अतीप्राचीन भाषा आहे.तसेच वेदांची जननी आहे,देव वाणी आहे,ज्ञानाचा महासागर असलेली संस्कृत भाषा खूप सुंदर असून संस्कृत पाठांतर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थी मित्रांनो पाठांतर शिवाय पर्याय नाही.पाठांतरावर माणूस जीवनात मोठा होतो पाठांतर चिंतन-मनन वाचलेलं जन्मभर विद्यार्थ्यांना त्याची शिदोरी म्हणून पुरत असते.पूर्वी पाठांतराला भरपूर महत्त्व होते.मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थी परिपूर्ण घडतो आणि जीवनात यशस्वी होतो.आज मला आमच्या शिक्षकांची आठवण होते तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांची आठवण येईल असे शिक्षण दिले पाहिजे.अनेक शिक्षणतज्ञ म्हणतात पाठांतर नको पण पाठांतर शिवाय शिक्षणाला महत्त्व नाही.संस्कृत भाषेचे व पाठांतराचे महत्त्व ओळखून आपल्या संस्थेने संस्कृत पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते.सातशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेतील तीनही परितोषिके महापुरुषांच्या नावाने देण्यात येतात.पहिले बक्षीस – संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले पुरस्कार- रूचा गोरीवले, आशा भालेकर, भक्ती रेणुसे, अनन्या गोवंडे, सानिया भंडारे, अनुश्री पोळेकर दुसरे बक्षीस – संस्कृत प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार- श्रेया जिरगे, सौम्या कुलकर्णी,सिद्धांत पटवे,नील पत्की,संदेश सरवदे,साक्षी मेहेंदळे तिसरे बक्षीस – लेखक छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार – प्रांजल महाडिक,निशा बन,मधुरा शेळके,आर्या गरगटे,आकांक्षा वाडेकर, ईशान ठाकूर या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी घेवडे,सतीश लिंबेकर, सुमिता पाटील,ईशानी ढेरे,खंडू खेडकर,अमित ओमासे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.