पुणे-महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये असणार्या तीळवन तेली समाजाला यापुढे निश्चितच राजकीय
न्याय दिला जाईल. तसेच जगतगुरू संताजी महाराज जगनाळे यांचे अतिशय चांगले स्मारक
पुण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करेल अशी ग्वाही कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे
उमेदवार मोहन जोशी यांनी आज दिली. तसेच मी खासदार म्हणून निवडून आलो की तेली
तीळवन समाजाचे नेते आबा बागूलही आमदार असतील असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात
सांगितले.
तीळवन तेली समाजाचा वधू-वर मेळावा कोथरूड येथील आशिष गार्डन येथे संपन्न
झाला. सुमारे ३ हजार हून अधिक उपवर, वधूवर व पालक याप्रसंगी उपस्थित होते. त्यांना
शुभेच्छा देण्यासाठी मोहन जोशी आवर्जून तेथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत माजी
उपमहापौर नगरसेवक आबा बागुल तेथे होते. प्रारंभी अध्यक्ष विजय हाडके यांनी मोहन
जोशींचे स्वागत केले व प्रास्थाविक केले. ते म्हणाले की, आम्ही कॉंग्रेस पक्षाचेच मतदार असून
या निवडणुकीतही कॉंग्रेसलाच मतदान करणार आहोत. याप्रसंगी बोलताना आबा बागुल
म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी मध्ये १ कोटीहून अधिक लोकसंख्या तीळवन तेली समाजाची
आहे. तर पुण्यात ही संख्या १ लाखांवर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने समाज असूनही समाजाला
राजकीय न्याय मिळाला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच जगतगुरू संताजी महाराज
जगनाडे यांच्या नावाने पुणे महानगर पालिकेचा प्रतिष्टेचा पुरस्कार आम्ही सुरु केला, मात्र
भाजपने हा पुरस्कार निलंबित ठेवला असे ते म्हणाले. तसेच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी
यांनी आपल्या देशात तंत्रज्ञान क्रांती केली. त्याचा उपयोग करून यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्स
द्वारे वाढू वर मेळावे आयोजित केले जावेत अशी सूचना ही त्यांनी केली.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ग्रामदैवत रोकडोबा यांचे दर्शन
कॉंग्रेस भवन मागील मंदिरात जाऊन घेतले. याप्रसंगी माजी आमदार दीप्ती चवधरी व शिवाजी नगर गावठाणातील
प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.