पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस भवन
येथे पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या नियोजनाच्या तयारीसाठी बैठक बोलविण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या
प्रचारासाठी पक्षाच्या आदेशानुसार विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. पक्षाचा प्रचार सामान्य
जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विधानसभा निहाय प्रमुख व निरिक्षक नेमण्यात आले आहेत. विधानसभा
प्रमुख व निरिक्षकांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांच्याशी
संपर्क साधून ब्लॉक कमिटी व वॉर्ड कमिटीची बैठक घेऊन त्यांच्या बुथमधील माहिती घेऊन त्या ठिकाणी
प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे असे सांगितले.
गेली ५ वर्ष मोदी सरकारने जनतेला अच्छे दिनचे
स्वप्न दाखविले आणि २०१४ मध्ये जनतेला जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली नाही. मोदी
सरकारचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे. नोटबंदीच्या चूकीच्या निर्णयामुळे व जी.एस.टी. ची
योग्य पध्दतीने अंमलबजावणी न केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा त्रास झालेला आहे. शेतकरी,
शेतमजूर, कष्टकरी कामगार हवालदिल झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला टेकल्यामुळे
सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. जनतेच्या या प्रश्नाकडे मोदी सरकारने जाणून बुजून पाठ
फिरविली आहे आणि खोटे बोला पण रेटून बोला ही ग्लोबल नीती मोदी सरकार राबवित आहे. पक्षाच्या
जाहिरनाम्यामार्फत, जाहिर सभा व सोशल मिडियामार्फत काँग्रेस पक्षाने केलेला विकास आणि सत्तेवर
आल्यावर देशाचे विकास कसे करणार हे मतदारापर्यंत पोहचविणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी
व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेला उमेदवारासाठी रात्रंदिवस एक करून निवडून आणण्याचा निर्धार करूया.’’
यानंतर डॉ. रत्नाकार महाजन व उल्हासदादा पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, आबा बागुल,
नीता रजपूत, रशिद शेख, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, अविनाश बागवे, मनिष आनंद,
लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, विशाल मलके, सोनाली मारणे, भुषण रानभरे, शिवाजी केदारी,
दत्तात्रय गायकवाड, डॉ. सतिश देसाई, दत्ता बहिरट, काका धर्मावत, शिवाजी बांगर, सचिन आडेकर,
सुनिल घाडगे, विजय खळदकर, प्रविण करपे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रमेश सकट, विठ्ठल थोरात,
भगवान धुमाळ, ॲड. निलेश बोराटे आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.