शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हीच सोडवू बापट यांचा विश्वास..
पुणे : “स्वामीनाथन आयोगाचा अहवाल गेल्या १४ वर्षांपासून स्वीकारला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्याची अंमलबजावणी सुरु केली. पिकाला पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार प्रकल्पाला मूर्त रूप दिले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. परंतु, शेतकऱ्यांची २० हजार कोटींची कर्जे आमच्या सरकारने माफ केली. तसेच शेतकऱ्यांना पेन्शनही सुरु केली. येत्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेने आम्ही ठोस पाऊले उचलणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हीच सोडवू,” असा विश्वास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दर्शविला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वडगाव शेरी येथील मांजरी खुर्द व वडगाव शिंदे मतदार संघातील ग्रामस्थांशी बापट यांनी संवाद साधला. यावेळी आमदार जगदीश मुळीक, रोहिदासशेठ उंद्रे पाटील, कांताराम माने, सरपंच धनश्रीमाई उंद्रे, दादा सातव,गणेश कुटे,स्वप्निल उंद्रे,शिवाजी उंद्रे, माऊली साळुंके,माऊली उंद्रे,हिरामण गवळी, विकास उंद्रे,बाळासाहेब भोसले,बापुसाहेब पवार,लक्ष्मण नेवाळे,गौतम भोसले, सरपंच हेमलता शिंदे, युवराज काकडे, दादा सातव, जीवन काकडे, वैभव शिंदे, रामभाऊ काकडे, कल्याण शिंदे, विजय शिंदे, तानाजी शिंदे, संजय शिंदे, रमेश काकडे आदी उपस्थित होते. यावेळी लग्नाचा मुहूर्त असतानाही नवरदेव अनिल उंद्रे यांनी कोपरा सभेस उपस्थित राहून बापट यांना पाठिंबा दिला.
बापट म्हणाले की, एक ना अनेक योजना या सरकारने शेतकऱ्यांसाठी आणल्या आहेत. फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सरकारने कामे केली. येत्या काळात ग्रामीण भागाच्या विकासाचे ध्येय ठेऊन भामा आसखेड सारख्या प्रकल्पातून पुण्याला पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. जायका सारख्या प्रकल्पातून सांडपाण्याच्या पुर्नवापर करण्याचा आमचा मानस आहे. आमच्या सरकारचा विकासात्मक दृष्टीकोन असून खासदार झाल्यावर भविष्यात या गावाचा विकास करण्याचा शब्दही बापट यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
ग्रामस्थ म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमधून बापट यांनी निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा नियोजन समिती मधून जितका निधी या गावाच्या विकासकामासाठी उपलब्ध झाला. तितका निधी गेल्या अनेक वर्षापासून मिळाला नव्हता. विकासाने आणि प्रेमाने माणूस जोडता येतो याप्रमाणे वडगाव शिंदे येथील गावकरी आज भाजप सोबत आहे. भाजपची विकासाची दृष्टी हे त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे काम करणाऱ्या पक्षाच्या, नेत्यांच्या पाठीशी आम्ही सदैव असू, असा विश्वास येथील ग्रामस्थांनी बापट यांना दिला.
कसबावासीयांचे प्रेम विसरू शकणार नाही-
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गेली ४५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकलो. भाजपचे सरकार नसतानाही कसबावासीयांनी माझ्यावर विश्वास आजपर्यंत कसबा मतदार संघातून विधानसभेत पाच वेळा निवडून गेलो. कसब्यातील लोकांनी दिलेले प्रेम विसरू शकत नाही.