पुणे- ७० वर्षापूर्वी ज्या कोणी पाप केले ,पाकिस्तानची निर्मिती झाली, त्यातून हा देश कायम आतंकवादी कारवाया आणि सैनिकी कारवाया यांचा त्रास सहन करतो आहे पण आता देशाच्या सेनेचे स्वातंत्र्य ,सैन्यबळ हे आपण समर्थ केलं आहे असे सांगत केंद्र आणि राज्य सरकारने नेमके काय काय केलंय याची थोडक्यात माहिती आज पुणे शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली . ते म्हणाले अनेक वर्षे प्रलंबित ठेवलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील भाजपनेच सोडविला . सवर्णांच्या आर्थिक निकषावरील आरक्षणाचा प्रश्न हि भाजपनेच सोडविला . भाजप सरकारने केलं तरी काय हे विचारणाऱ्यांना आम्ही समर्थ पणेउत्तरे देवू शकतो …पहा आणि ऐका नेमकं गोगावले यांनी म्हटलंय तरी काय ते त्यांच्याच शब्दात …