मुंबई-दक्षिण मुंबईतील शाळामध्ये मराठी भाषेलाकमी लेखले जात असल्याचा आरोप करीत या दोन्ही भाषा काय केवळ ड्रायव्हर आणि नोकरांच्या आहेत काय ? असा जळजळीत सवाल हि त्यांनी केला .
शायना(एनसी, प्रवक्ता, भाजप )यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी एका पत्रकार परिषदेस संबोधित केले आणि मुंबईतीलखाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय शिकवली न जाण्याबददल खंत व्यक्त केली.
मुंबईत २००० हून अधिक खाजगी शाळा आणि आंतरराष्ट्रीय (international schools) शाळा आहेत. ८ वी पर्यंतचेबहुतेक सर्व खाजगी शाळांमध्ये मराठी अनिवार्य आहे. परंतु, काही शाळा मराठी भाषेचा तास इतर विषयांसाठी
वापरतात. ८ व्या वर्गापासून पुढे मराठी पर्यायी विषय बनला आहे आणि पर्याय म्हणून फ्रेंच किंवा जर्मनची निवडकेली जाते. कोणत्याही स्थानिक भाषेची आणि राष्ट्रभाषेची तुलना परदेशी भाषाशी करता येईल का? इथे हेतू कोणत्याही
परदेशी भाषेचा निषेध करण्याबाबत किंवा शाळांमध्ये इंग्रजीचा वापर कमी करण्याबद्दल नाही परंतु मुद्दा दोन भाषांचेसह-अस्तित्वाचा आहे. आपल्या भावी पिढीच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी मराठी व हिंदी भाषेचे जतन करणे आवश्यक
आहे.
मराठी भाषेची परंपरा आणि वारसा समृद्ध आहे आणि तरीही यास खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये दुर्लक्षितकेले जाते. कोणतीही परदेशी भाषा शिकण्यास इच्छुक असलेली विद्यार्थी खासगीरित्या ही भाषा शिकू शकते. फ्रेंचकिंवा जर्मन भाषा विद्यार्थ्यांकडून दररोजच्या कामात वापरली जाणार नाही परंतु मुंबईत त्यांना रोजच्या रोज मराठी भाषेचा वापर करावा लागेल.
शायना एन.सी. म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्यात राहायचे, काम करायचे असेल तर मराठी यायलाच हवी. मराठी भाषेकडे शाळांमध्ये दुर्लक्ष केले जात आहे आणि या शाळेचा एकुण दृष्टिकोन मराठीला घेऊन अनुकूल नाही. मराठी
आणि हिंदी भाषा ड्रायव्हर आणि नोकरांची भाषा म्हणून दक्षिण मुंबईच्या लोकांमध्ये ओळखली जाते. शाळेत जाणाऱ्यादोन मुलांची आई या नात्याने, मला जाणवल की माझ्याच मुलांना ही भाषा शिकण्यास स्वारस्य नाही. या दिशेने एक
मजबूत पाऊल उचलण्याबद्दल संबंधित विभागांना मी पत्र देखील पाठविले आहे. कोणत्याही भाषेबद्दल प्रेम आणिआवड हे शालेय शिक्षणातून येते, हे विसरता कामा नये. आपल्याच राज्यात मराठी भाषेची होणारी गळचेपी ही गंभीर
बाब असून आम्ही या संदर्भात शिक्षण मंत्री आणि राज्यपाल यांना पत्र
पाठविले आहेत. आम्ही सर्व शाळांना या संदर्भात परिपत्रक जारी करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये आठवीनंतर मराठी व हिंदी या दोन्ही भाषा पर्याय म्हणून ठेवावे असं सुचविले आहे’
माझ्या शाळेत मला मराठी शिकवली नाही गेली यामुळे मला स्पष्ट मराठी येत नाही असे शायना एन. सी. यांनी मान्य केले. आज मला मराठी येते, तसे प्रयत्न मी करतेय. सध्या आपण साने गुरूजीचे ‘श्यामची आई’ पुस्तक वाचत
असल्याचे सांगितले. ती एक उत्तम साहित्यकृति असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेच्या शेवटी त्यांनी, जाहीर केले की त्या ‘बारायण’ नावाचा मराठी चित्रपट सादर करीत आहे. हा चित्रपट शिक्षणावर
भाष्य करणारा आहे आणि तो सामाजिक संदेश घेऊन येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माता दैवता पाटीलही परिषदेत उपस्थित होते.