पुणे : भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, महापाैर मुक्ता टिळक आदी यावेळी उपस्थित हाेते. माेदींच्या राज्यात मुस्लिम सुरक्षित असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
हुसेन यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर बाेलत विराेधकांवर हल्ला चढवला. हुसेन म्हणाले, माेदींवर सगळेच प्रेम करतात. राहुल गांधींना देखील बाेलावं लागलं की ते माेदींवर प्रेम करतात. गांधी जे बाेलतात ते करत नाहीत. संसदेत माेदींची गळाभेट घेतात आणि नंतर डाेळा मारतात. आणि बाहेर माेदींचा द्वेष करतात. काल राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या सभेत माेदींनी अडवाणी यांना स्टेजवरुन खाली उतरवले अशी टीका केली हाेती. त्यावर बाेलताना हुसेन म्हणाले, गांधी भाषेची मर्यादा ताेडत आहेत. टीका करताना आम्ही कधी भाषेची मर्यादा साेडली नाही. गांधी यांनी टीका करताना जी भाषा वापरली त्याचा आम्ही निषेध करताे. त्यांनी देशाची माफी मागायला हवी. गांधी कधी भारतीय सेनेचा अपमान करतात तर कधी ज्येष्ठांचा अनादर करतात. अमित शहा यांच्या अर्जात कुठलिही त्रुटी नाही. काॅंग्रेसला सगळीकडे खाेटं दिसतं. त्यांनी आपली नजर बदलावी. त्यांनी केलेल्या आराेपात कुठलेही तथ्य नाही.
देशातील सहाशे कलाकार एकत्र येत त्यांनी भाजपाच्या विराेधात मतदान करा असे आवाहन केले आहे. यात ज्येष्ठ दिग्दर्शक अमाेल पालेकर यांच्याबराेबरच अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा सहभाग आहे. या सहाशे कलाकारांची मते विराेधात गेली तरी भाजपाला फरक पडत नसून भाजपाच्या बाजूने चाैकाचाैकात सहा हजार मतदार उभे राहतील अशी टीका हुसेन यांनी कलाकारांवर केली.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन 600 कलाकारांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांमध्ये नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. भाजपाविरोधात मतदान करून त्यांना व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून पायउतार करा, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे.कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केलं आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरं तर हे पत्र एक दोन, नव्हे तर 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.
यावर बोलताना हुसेन म्हणाले, सहाशे कलाकारांची मते नाही मिळाली तरी भाजपाला फरक पडत नसल्याचे हुसेन म्हणाले. तसेच अशी टीका करण्यापेक्षा कलाकारांनी राजकारणात येऊन थेट टीका करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी कलाकारांना दिले. देशात भिती वाटते असे नसरुद्दीन शहा एका मुलाखतीत म्हंटले हाेते. त्यावर हुसेन म्हणाले की शहांना भीती वाटते तर आम्ही काही करु शकत नाही. 600 कलाकारांनी आम्हाला मतदान केले नाही तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला देशातील 132 कराेड लाेक मतदान करतील.