सामाजिक विकासासाठी व्यवसायिक विकास आवश्यक – अमृता फडणवीस
मुंबई-सामाजिक विकासासाठी व्यवसायिक विकास अत्यंत आवश्यक आहे. जैन समाजाने या देशात आजपर्यंत जे प्रयत्न केले त्यामुळेच समाजात विकासाची संधी वाढली आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) द्वारा आयोजित बिझनेस कॉनक्लेव अंड ट्रेड अफेअर ‘जितो उडान’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. गोरेगाव पूर्व येथील नॅशनल एक्जीबिशन सेंटर ‘नेक्सा’ येथे आयोजित ‘जितो उडान’ भारताच्या विकासाचा आरसा असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. श्रीमती फडणवीस यांनी ध्वजारोहण सोबत दीप प्रज्वलित करून आणि रिबीन कापून जितो उडान चे उद्घाटन केले. याप्रसंगी जितो एपेक्सचे चेअरमन प्रदीप राठोड, व्हाईस चेअरमन सुखराज नाहर, प्रेसिडेंट गणपत चौधरी, व्हाईस प्रेसिडेंट विजय भंडारी आणि जितोचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी श्रीमती फडणवीस सोबत उपस्थित होते. या कार्यक्रमात 10 हजार लोक उपस्थित होते.
या बिझनेस कॉनक्लेवमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून उद्योगपती, प्रतिष्ठित व्यवसायिक, उत्पादक आणि स्टार्टअप करणाऱ्या अनेक नवीन उद्योजकांना संबोधित करताना श्रीमती फडणवीस म्हणाल्या की, जैन समाज व्यवसायिक नेतृत्वाच्या क्षमतेने भरलेला समृद्ध समाज आहे. जो आपल्या सोबतच इतर समाजाच्या विकासासाठीही प्रयत्न करत आहे. उद्घाटन समारोहनंतर श्रीमती अमृता फडणवीस यांनी ‘जितो उडान’च्या अनेक प्रमुख स्टॉलवर जाऊन स्वतः उत्पादकांची कॉलिटी, व्यवसायिक विकास आणि उत्पादक वस्तू बाजारात गेल्यानंतर त्याच्या महत्त्वाची माहिती घेतली. यासोबतच वर्तमानात व्यवसायिकांची परिस्थिती आणि उत्पादक बाजारात टिकून राहण्यासाठी करत असलेले प्रयत्न, अशा अनेक विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.
‘जितो उडान’ जैन समाजाची विश्वस्तरीय संस्था जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जितो) चा पहिला उपक्रम आहे. जो मूळ रूपाने व्यवसायिक विकास आणि सामाजिक विकासाच्या कार्याला समर्पित आहे. श्रीमती फडणवीस यांनी याप्रसंगी सातशे हून अधिक ट्रेड स्टार्ट, स्टार्टअप पवेलियन, रोजगाराच्या अनेक संधी आणि व्यवसायिक विकास संबंधित सेमिनार, कॉन्फरन्स सोबतच शेकडो अत्यंत दुर्लभ आणि धार्मिक महत्त्व असलेल्या जैन मूर्तींनी सजलेल्या पवेलियनचेही निरीक्षण केले. नाहर ग्रुपद्वारे प्रायोजित जैन पवेलियन ‘जितो उडान’चे सर्वात प्रमुख आकर्षण आहे. ‘जितो’ मुंबई झोनचे अध्यक्ष हितेश दोशी आणि प्रमुख सचिव विकी ओसवाल यांनी श्रीमती फडणवीस यांचे जैन पवेलियनमध्ये स्वागत केले. ‘जितो उडान’च्या उद्घाटन प्रसंगी आयोजित स्थळावर जवळपास दहा हजार लोक उपस्थित होते. श्रीमती फडणवीस यांनी ‘जितो उडान’ व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हणाले. त्यांनी या आयोजना प्रती लोकांच्या उत्साहाच कौतुक केलं आहे.