सरकार व्यापाऱ्यांचे हित आणि व्यवसायाची काळजी घेणार
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आर्थिक विकासाचे नवीन वातावरण तयार होत आहे. यामुळे आगामी काळात भारतात उत्पादकाची स्वयंपूर्णता वाढेल. आपले सरकार नवीन आर्थिक सुधारणांना घेऊन सज्जक आहे,’ असे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले आहेत. गोयल दक्षिण मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या समर्थनात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना असे म्हणाले आहेत. भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या वतीने दक्षिण मुंबई येथील सीपी टँक येथील माधवबाग येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार लोढा यांनी गोयल यांचे स्वागत केले आणि सावंत यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील एक प्रामाणिक आर्थिक व्यवस्था असलेल्या देशाच्या रूपात पुढे येत आहे. मोदी यांच्या मोहिमेत व्यापारी वर्गही आपला पूर्ण सहयोग देत असून ही आनंदाची गोष्ट आहे. गोयल पुढे म्हणाले की, मागील ५ वर्षात मोदी सरकारने भ्रष्टाचारात एक रुपयाही जाऊ दिला नाही. तसेच आपल्या या प्रामाणिक सरकारने पारदर्शकतेने काम केले.
भारतीय रेल्वेच्या विकासात ऐतिहासिक बदल घडवण्याचा दावा करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात ५५ वर्षात काँग्रेसच्या राज्यात भारतीय रेल्वेचा केवळ ३० टक्केच विकास झाला. मात्र आज मोदी सरकारच्या पाच वर्षाचा कार्यकाळात फक्त मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विकासाची ७५ हजार कोटींची कामे सुरू आहेत. मोदींच्या दृष्टिकोनाचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले आहेत. कारण मोदींना माहित आहे की, मुंबईमध्ये ७५ लाख लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना कशी सुविधा दिली जावी. ५ वर्षात अडीच पट रेल्वे निवेश वाढल्याची माहिती देत रेल्वेमंत्री गोयल म्हणाले की, पुढील ५ वर्षात १ कोटी ५० लाखाचा निवेश होणार आहे. त्यांनी सांगितले की लोकल रेल्वेच्या पटरीवर पडलेला ५० हजार हॅट्रिक कचरा काढण्यात आला आहे. याआधी रेल्वे पट्ट्यांवर इतकी स्वच्छता कधीच नव्हती, असेही ते म्हणाले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संचर रहिवासींसह सर्व रेल्वे सुविधांपासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचवणार असल्याचे सांगितले.
देशातील टॅक्स सिस्टम बदलण्याची माहिती देत रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही व्यापार आणि व्यापाऱ्यांच्या हिताची काळजी घेत असा टॅक्स सिस्टम तयार केला आहे की, ज्यामध्ये अधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या भ्रष्टाचाराची प्रक्रिया संपवण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अशी व्यवस्था आहे की केवळ ०.३५ रिटर्न्स चीच स्क्रूटनी होत आहे. सण २०१४ त्या तुलनेत आज २०१९ समाप्त होता-होता तीन कोटी इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना लोकांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.