पुणे- शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जळगाव येथे
घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली .जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना यावेळी निवेदन देण्यात आले .
जळगाव जिल्हातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत आंघोळ केल्याने पाणी विटाळले म्हणून मातंग
समाजातील दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वाकडी
गावात घडलेली हि घटना अत्यंत संतापजनक आहे.
उना, राजकोट नंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील दलितांवरील अत्याचार करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. भाजप शासित
अनेक राज्यांमध्ये अशा घटना मोठ्याप्रमाणात घडताना दिसतात. परंतु सरकार अशा घटना रोखण्यास कोणतेही पाउल
उचलताना दिसत नाही. अश्याप्रकारे निर्दयी मारहाण करणाऱ्यांना व जातीयवादी प्रवृत्तींना सरकार पाठीशी घालत
असल्याचे दिसत आहे.
अशा सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहराध्यक्षा वंदना चव्हाण
यांच्यासमवेत आ. जयदेवराव गायकवाड, चेतन तुपे, प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, अशोक राठी, भैया
जाधव, पंडित कांबळे, मनाली भिलारे, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, ऋषी परदेशी, शशिकांत तापकीर, भोलासिंग
अरोरा, स्वप्नील खडके इ. उपस्थित होते .